शासनाने वान धरणातील पाणी आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर
महापालिकेने ‘अमृत अभियान’च्या टप्पा-२ अंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी
Related News
निक पत्रकार नंदन प्रतिमा शर्मा बोर्डोलोई यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये,
फाटलेल्या नोटांमध्ये अडकलेला एक मृत उंदीर स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ...
Continue reading
नवी दिल्ली :
भारतीय आणि जागतिक इतिहासात १६ एप्रिल ही तारीख अनेक मोठ्या आणि ऐतिहासिक घटनांसाठी ओळखली जाते.
या दिवशी भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास झाला होता, ज्याने देशातील परिव...
Continue reading
तेल्हारा (तालुका प्रतिनिधी):
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने तेल्हारा येथे भव्य
आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. ९ एप्रिल २०२५ रो...
Continue reading
अलीगड (उत्तर प्रदेश),
14 एप्रिल 2025 – अलीगडमधील अतरौली शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये देवी-देवतांचे चित्र असलेल्या
कागदी नैपकिनचा वापर केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.
या ...
Continue reading
राजुरा घाटे येथे आढळली दुर्मीळ पांढरी चिमणी.
मुर्तिजापूर : मुर्तिजापूर तालुक्यातील राजुरा घाटे येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेतील पक्षीमित्र
शिक्षक श्री. मनोज लेखनार हे गेल्या...
Continue reading
नवी दिल्ली:
दिल्ली मेट्रोमध्ये प्रवासादरम्यान काही महिला प्रवाशांनी फर्शावर बसून भजन-कीर्तन सुरू केले.
या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यावर नेटकऱ्यांच्या मि...
Continue reading
गुरुग्राम (हरियाणा):
दिल्लीच्या शेजारील गुरुग्राममधील नामांकित खासगी रुग्णालयात एका एअर होस्टेसवर
वेंटिलेटरवर असतानाच बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पीडित महि...
Continue reading
नवी दिल्ली /
अकोला — "उर्दू ही एक लोकभाषा आहे, ती कोणत्याही विशिष्ट धर्माशी जोडलेली नाही.
तसेच, मराठीबरोबर उर्दूचा वापर करण्यावर कोणताही कायदेशीर प्रतिबंध नाही,
" अशा स्पष्ट शब...
Continue reading
नवी दिल्ली / नाशिक:
भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.
आता रेल्वे प्रवासादरम्यानही एटीएममधून पैसे काढणे शक्य होणार आहे.
देशात प्रथमच चालत्या गाडीत एटीएम...
Continue reading
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अमरावती विमानतळ आणि सेवा लोकार्पण; 18 एप्रिलपासून नियमित सेवा सुरू
अमरावती (18 एप्रिल 2025):
विदर्भातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
मुंबई-अमरावती...
Continue reading
महानगरपालिकेचे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन
अकोला (15 एप्रिल 2025) –
अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा जलप्रकल्पातील साठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे.
त्यामु...
Continue reading
नाशिक (16 एप्रिल 2025) – नाशिक महानगरपालिकेने अनधिकृत ठरवलेल्या
काठे गली सिग्नल परिसरातील सातपीर दर्गा हटविण्याच्या कारवाईसाठी गेलेल्या महापालिका
आणि पोलिस पथकावर काल रात्री दगडफ...
Continue reading
तयार केलेला ७३६ कोटींचा ‘डीपीआर’ रखडला होता.
शासनाच्या सुकाणू समितीने पाण्याचा पर्यायी स्रोत शोधण्याचे निर्देश दिल्यानंतर
मनपाने बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव धरणातून पाणी आरक्षणासाठी धावाधाव सुरू केली होती.
अखेर विदर्भ पाटबंधारे विकास मंडळाने
जिगाव प्रकल्पातून २४.१३ दलघमी जलसाठ्याच्या आरक्षणावर
२० जून रोजी शिक्कामोर्तब केले.
यासंदर्भात भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर
यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत पत्रव्यवहार केला होता.
शासनाच्या निर्णयामुळे महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे.
अकोलेकरांना दैनंदिन पाणीपुरवठा करण्यासाठी
‘अमृत अभियान’ अंतर्गत केंद्र व राज्य शासनाने सन २०१७ मध्ये
११० कोटी रुपयांचा निधी वितरित केला होता.
या निधीतून हद्दवाढ़ क्षेत्र वगळता शहरातील अंतर्गत जलवाहिन्यांचे
सुमारे ४४५ किमीचे जाळे बदलणे तसेच आठ जलकुंभ उभारण्याचा समावेश होता.
संबंधित कंत्राटदाराने आठपैकी सात जलकुंभांचे काम पूर्ण केले असून
आठवा जलकुंभ अद्यापही उभारला नाही.
यादरम्यान, मनपाने ‘अमृत अभियान’च्या टप्पा-२ अंतर्गत
प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी नागपूर येथील
पुराणिक ब्रदर्स एजन्सीची नियुक्ती केली.
२०१७ मध्ये मनपाने शहराची सन २०५५ पर्यंतची
संभाव्य लोकसंख्या गृहीत धरून वान धरणातून
२४ दलघमी जलसाठ्याचे आरक्षण निश्चित केले होते.
तेल्हारा येथील शेतकऱ्यांचा विरोध पाहता
तत्कालीन भाजप-शिवसेना युती सरकारच्या कालावधीत
पाणी आरक्षणाला स्थगिती देण्यात आली होती.
ही स्थगिती कायम असताना मनपाच्या निर्देशानुसार
पुराणिक ब्रदर्स एजन्सीने वान धरणातील २४ दलघमी पाणी आरक्षण
गृहीत धरून तब्बल ७३६ कोटी रुपयांचा प्रकल्प अहवाल तयार केला होता.
या अहवालाला राज्याच्या तांत्रिक समितीने मंजुरी दिली होती.
परंतु या धरणातील प्रस्तावित पाणी आरक्षणाला
तत्कालीन शासनाने स्थगिती दिली असतानाही
‘डीपीआर’ तयार करण्याच्या मनपाच्या भूमिकेवर
सुकाणू समितीने प्रश्नचिन्ह उपस्थित करीत
पाण्याचा पर्यायी स्रोत शोधण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले होते.
सुकाणू समितीच्या निर्देशानंतर मनपा प्रशासनाने
बुलढाणा जिल्ह्यातील नांदूरा तालुक्यात असलेल्या ‘जिगाव’ प्रकल्पातून
४८ दलघमी पाणी आरक्षणाचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाकडे सादर केला होता.
परंतु आरक्षणाच्या मुद्यावर पाटबंधारे बोट ठेवत हा प्रस्ताव बाजूला सारला.
अखेर या संदर्भात आ. रणधीर सावरकर यांनी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केला.
त्यानंतर शासनाने २४.१३ दलघमीच्या जलसाठ्याला मंजूरी दिली.
Read also: https://ajinkyabharat.com/gurugram-sfotani-haadrale-fire-fighting-machine-manufacturing-factory-burnt-to-ashes/