उध्दवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांचे आवाहन
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेने भाजपला जमिनीवर आणले आहे.
Related News
मुंबई :राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) सुमारे ३५ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुकारलेला २३ दिवसांचा बेमुदत संप अखेर आज मागे घेण्यात आला. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोब...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
ज्वारी काढणीच्या कामात नागाचा साक्षात्कारझाल्याने शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाल...
Continue reading
महाराष्ट्र बोर्डाच्या २०२५ च्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून,
यंदाही विद्यार्थ्यांची यशाची टक्केवारी उंचावलेली दिसून येते. मात्र जे विद्यार्थी या परीक्षेत अपयशी ठर...
Continue reading
आज अक्षय्य तृतीया असल्यामुळे बाजारपेठेत चांगलीच खरेदीची चहलपहल दिसून येतेय.
पारंपरिकदृष्ट्या या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं.
गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याचे दर उच्चां...
Continue reading
- ईस्टर संडेनिमित्त विविध कार्यक्रम
अकोला: शहरासह अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये शुक्रवारी ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र सण
गुडफ्रायडे मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. शहर...
Continue reading
Prashant Koratkar : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकर आता अटकपूर्व
जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज करणार असल्याची माहिती...
Continue reading
छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करुन ठार मारणाऱ्या क्रूरकर्मा औरंगजेबाला देखील याच महाराष्ट्रात गाडण्यात आलंय.संभाजी महाराजानंतर रामराम महाराज, महाराणी ताराबाई आणि मराठा योद्...
Continue reading
या 5 जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 10 ते 17 मार्च या दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असणार आहे.
मुंबई:
विधान परिषदेच्या पाच जागा रिक्त झाल्या आहे. यासाठी आता
Continue reading
मेगा ब्लॉक रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहेत.
प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडू...
Continue reading
Donald Trump : दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकी काँग्रेसला संबोधित करत आहेत.
Continue reading
संतोष देशमुख हत्या प्रकरणात समोर आलेले फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरअखेर मंत्री ध...
Continue reading
२८ जागांवर लढणाऱ्या भाजपला अवघ्या नऊ जागांवर गुंडाळून ठेवले.
जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात असलेली चीड मतांमध्ये रूपांतरित केली.
परिणामी मोदी सरकारला सत्ता स्थापन करताना
नितीश कुमार व चंद्रबाबू नायडू यांची साथ घ्यावी लागली.
या दोन्ही नेत्यांचा पूर्वइतिहास तपासल्यास ते कधी पलटी मारतील,
याचा भरवसा नसल्यामुळे केंद्र सरकार औटघटकेचं असून
तुम्ही विधानसभेच्या कामाला लागण्याचे आवाहन
उध्दवसेनेचे खासदार तथा विदर्भाचे संपर्क प्रमुख अरविंद सावंत यांनी शिवसैनिकांना केले.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उध्दवसेनेने
विधानसभा निवडणुकीच्या चाचपणीला प्रारंभ केला असून
गुरुवारी पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी
शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत अकोल्यात दाखल झाले होते.
आढावा बैठकीनंतर पदाधिकारी व शिवसैनिकांना खा. सावंत
यांनी मार्गदर्शन केले. आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच
विधानसभा निवडणूक लढणार आहोत.
पुढील तीन महिन्यांनंतर राज्यात
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याने
तुम्ही जोमाने कामाला लागा, असे आवाहन
खा. सावंत यांनी केले. यावेळी मंचावर जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश शिरवाडकर,
वाशिम संपर्क प्रमुख दिलीप जाधव, सहसंपर्क प्रमुख सेवकराम ताथोड,
जिल्हाप्रमुख आमदार नितिन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर,
प्रा. नरेंद्र खेडेकर, माजी आ. संजय गावंडे, हरिदास भदे,
अतुल पवनीकर, राजेश मिश्रा, राहुल कराळे आदींची उपस्थिती होती.
होय, मुस्लिमांनी मते दिली !
जनतेने भाजपला बाजूला सारत महाविकास आघाडीला कौल दिल्याचे सांगत
खा. अरविंद सावंत यांनी आघाडी व सेनेच्या उमेदवारांना
मुस्लिमांनी मतदान केल्याचे स्पष्ट केले.
हे आम्ही कधीच नाकारणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
संघटनात्मक बांधणीवर भर
भाजपला हद्दपार करण्यासाठी निष्ठावान शिवसैनिकांनी झटले पाहिजे.
यासाठी पुढील दिवसांत संघटन बांधणीवर भर देणार असल्याचे
जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांनी सांगितले.
जिल्ह्यात विधानसभेच्या तीन जागा लढणार असल्याचा निर्धार
आ. देशमुख यांनी व्यक्त केला.
Read also: https://ajinkyabharat.com/arvind-kejriwals-jaminala-adjournment-by-delhi-high-court/