२०२४ ची लोकसभा निवडणुक नुकतीच पार पडली आहे.
एनडीएने बहुमताच्या जोरावर सरकार स्थापन केले आहे.
Related News
सात महिने जुनी तक्रार दुर्लक्षित! मयुरीच्या आईने महिला आयोगाला लिहिलं होतं पत्र
“फायदा करून देणार 100 टक्के…”
EPFO चा 7 कोटी सदस्यांना गिफ्ट;
कान 2025 : आलिया भट्टच्या ड्रेसची मल्लिका शेरावतच्या गाऊनशी तुलना;
पुण्यातील बनावट कॉल सेंटरवर मोठी कारवाई;
“केंद्र आणि राज्यांनी टीम इंडियासारखे एकत्र काम केल्यास कोणतंही उद्दिष्ट कठीण नाही”
अकोट तालुक्यात परवानाधारक दुकानदारांना जून ते ऑगस्ट 2025 पर्यंतचे अन्नधान्य उपलब्ध;
किरीट सोमय्या हेच एक भोंगा – हर्षवर्धन सपकाळ….
हवामान खात्याकडून मान्सूनचा – डबल अटैक जारी !
21 वर्षीय तरुणाचा मृत्यू, पुन्हा एकदा सतर्कतेची गरज!
15 वर्षांनंतर सर्वात लवकर आगमन
‘महाबीज’तर्फे बीटी कापूस व तूर बियाण्याच्या नव्या वाणांचे लोकार्पण;
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली.
इंडिया आघाडीला विरोधात बसावे लागले आहे.
अशातच राहुल गांधी यांनी दिलेल्या एका मुलाखतीत एनडीए आघाडीबाबत
मोठा गौप्यस्फोट केला आहे.
एनडीएचे लोक आमच्या संपर्कात असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांनी नुकतीच फायनान्शियल टाइम्सला मुलाखत दिली आहे.
या मुलाखतीत राहुल गांधी म्हणाले की,
अनपेक्षित निवडणुकीच्या निकालानंतर भारतातील राजकीय परिस्थितीमध्ये मोठा बदल झाला आहे.
पंतप्रधान मोदींच्या सरकारला आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागेल,
तसेच भाजपच्या खासदारांची संख्या कमी आहे.
त्यामुळे एक छोटीशी गडबड सरकारला अडचणीत आणू शकते.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, आत्ता स्थापन झालेल्या
मोदी सरकारमध्ये मोठ्याप्रमाणात असंतोष आहे.
त्यामुळे एनडीएतील काही लोक आमच्या संपर्कात आहेत,
लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदींनी धार्मिक तणावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला.
त्यांनी भारतातील मोठ्या मुस्लिम अल्पसंख्याकांना घुसखोर म्हटले आहे.
राहुल पुढे म्हणाले की, आम्ही पाठीमागे हात बांधून लढलो.
भारतीय जनतेला, गरीब जनतेला, त्यांना नेमके काय करायचे आहे हे माहीत होते.
न्यायव्यवस्था, प्रसारमाध्यमे, संस्थात्मक संरचना हे सर्व विरोधकांसाठी बंद होते.
त्यांनी गेली १० वर्षे अयोध्येच्या मुद्द्यावर प्रचार केला परंतु त्यांना अयोध्येने नाकारले.
भारतीय राजकीय विश्लेषकांनी एनडीए आघाडीच्या स्थिरतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
यंदा एनडीए आघाडी कमकुवत असून सत्ता टिकवण्यासाठी
भाजपला छोट्या मित्रपक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे
असं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.