आज मुंबईत महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली.
या पत्रकार परिषदेत खासदार शरद पवार यांनी
Related News
आसाममध्ये उंदरांचा कहर :
इतिहासात १६ एप्रिल : भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास,
तेल्हाऱ्यात शिवसेनेची आढावा बैठक संपन्न –
अलीगडमध्ये देवी-देवतांच्या चित्र असलेल्या नैपकिनवरून वाद; हॉटेल मालक अटकेत
निसर्गाचा अद्भुत चमत्कार
दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचे भजन कीर्तन; CISF जवानांकडून फटकार,
गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात वेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेसवर बलात्कार; पोलीस तपास सुरु
“उर्दू कोणत्याही धर्माची भाषा नाही”; पातूर पालिकेवरील उर्दू फलकाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा! ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’द्वारे प्रवाशांना नवे बँकिंग स्वातंत्र्य
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
नाशिकमध्ये सातपीर दर्गा हटविण्यावरून हिंसाचार;
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
शरद पवार यांनी लोसकभा निवडणुकीतील राज्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांचा आकडा सांगत स्ट्राइक रेट काढला.
मुंबईत महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली.
या पत्रकार परिषदेते शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण,
जयंत पाटील, संजय राऊत आदी नेते उपस्थित होते.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले,
“पंतप्रधान मोदींच्या सभा आणि रोड शो जिथे झाल्या तिथे आमच्या उमेदवारांना
जनतेने मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला.
विधानसभेच्या निवडणुकीवेळी पंतप्रधानांच्या जेवढ्या जास्त जागांवर सभा होतील
तेवढी आमची स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल होईल.
त्यामुळे मोदींना धन्यवाद देणे हे माझं कर्तव्य आहे,
असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.
आज शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या
संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी त्यांनी राज्यातील विविध विषयावर भाष्य केले.
अजित पवारांना सोबत घेऊन भाजपने आपली किंमत कमी करुन घेतली
या प्रश्नावर बोलताना शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
“त्यांना नेमकं एवढंच सांगायचे आहे की,
महाराष्ट्राच्या जनतेने आमचा पराभव केला.
त्या सर्वांची कारणे अनेक आहेत.
पण ते अजूनही बोलू इच्छित नाहीत.
त्यांचा अनुभव त्यांनी सांगितला.
आम्ही कशाला काय सांगू,” अशी सूचक प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
यावेळी खासदार शरद पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवरही भाष्य केले.
आता अजित पवार यांना सोबत घेण्याचा प्रश्नच येत नाही, असंही पवार म्हणाले.
Read also: पवार – ठाकरे – पटोलेंची आज एकत्र पत्रकार परिषद (ajinkyabharat.com)