आज मुंबईत महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली.
या पत्रकार परिषदेत खासदार शरद पवार यांनी
Related News
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
शरद पवार यांनी लोसकभा निवडणुकीतील राज्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांचा आकडा सांगत स्ट्राइक रेट काढला.
मुंबईत महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली.
या पत्रकार परिषदेते शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण,
जयंत पाटील, संजय राऊत आदी नेते उपस्थित होते.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले,
“पंतप्रधान मोदींच्या सभा आणि रोड शो जिथे झाल्या तिथे आमच्या उमेदवारांना
जनतेने मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला.
विधानसभेच्या निवडणुकीवेळी पंतप्रधानांच्या जेवढ्या जास्त जागांवर सभा होतील
तेवढी आमची स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल होईल.
त्यामुळे मोदींना धन्यवाद देणे हे माझं कर्तव्य आहे,
असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.
आज शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या
संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी त्यांनी राज्यातील विविध विषयावर भाष्य केले.
अजित पवारांना सोबत घेऊन भाजपने आपली किंमत कमी करुन घेतली
या प्रश्नावर बोलताना शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
“त्यांना नेमकं एवढंच सांगायचे आहे की,
महाराष्ट्राच्या जनतेने आमचा पराभव केला.
त्या सर्वांची कारणे अनेक आहेत.
पण ते अजूनही बोलू इच्छित नाहीत.
त्यांचा अनुभव त्यांनी सांगितला.
आम्ही कशाला काय सांगू,” अशी सूचक प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
यावेळी खासदार शरद पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवरही भाष्य केले.
आता अजित पवार यांना सोबत घेण्याचा प्रश्नच येत नाही, असंही पवार म्हणाले.
Read also: पवार – ठाकरे – पटोलेंची आज एकत्र पत्रकार परिषद (ajinkyabharat.com)