“चांदीचे दागिने, नाणी आणि भांड्यांवर आता कर्ज घेण्याची संधी – RBI ने दिल्या नवीन मार्गदर्शक सूचना”
भारतीय नागरिकांसाठी चांगली आर्थिक संधी! रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) आता सोन्या-चांदीवर कर्ज घेण्यास परवानगी दिली आहे. याचा अर्थ असा की जर तुमच्याकडे चांदीचे दागिने, नाणी किंवा भांड्यांमध्ये चांदी असेल तर तुम्ही त्यावर बँका किंवा फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेऊ शकता. ही सुविधा खासकरून ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे, कारण अनेकांना अचानक आर्थिक गरज भासल्यास हे सोने-चांदी कर्ज उपयुक्त ठरेल.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या नियमांमध्ये सोने- गहाण ठेवण्याशी संबंधित सर्व बाबींचा समावेश आहे. या नियमांचा अंमल 1 एप्रिल 2026 पासून सुरू होणार आहे. यामुळे नागरिकांना त्यांच्या मौल्यवान धातूंवर आर्थिक मदत मिळण्याची संधी उपलब्ध होईल.
सोने-चांदीवर कर्ज कोण देऊ शकते?
आरबीआयने स्पष्ट केले आहे की, व्यावसायिक बँका (लघु वित्त व प्रादेशिक ग्रामीण बँकांसह), नागरी व ग्रामीण सहकारी बँका, बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFC) आणि गृहनिर्माण वित्त कंपन्या यांना हे कर्ज देण्याची परवानगी आहे.
Related News
कोणत्या वस्तूंवर कर्ज लागू होईल?
सोने- किंवा त्यांच्याशी संबंधित आर्थिक मालमत्ता जसे की गोल्ड ईटीएफ किंवा म्युच्युअल फंड युनिट्सवर हे कर्ज लागू होणार नाही.
फक्त दागिने किंवा नाणी स्वरूपातील सोन्या-चांदीवरच कर्ज मिळेल.
गहाण ठेवता येणारे दागिने व नाणी:
सोने: जास्तीत जास्त 1 किलो
चांदी: जास्तीत जास्त 10 किलो
सोनेची नाणी: 50 ग्रॅम
चांदीची नाणी: 500 ग्रॅम
यापेक्षा जास्त वजनावर कर्ज उपलब्ध होणार नाही.
कर्जाची मर्यादा:
आरबीआयने कर्जाची कमाल मर्यादा देखील निश्चित केली आहे.
2.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 85% पर्यंत कर्ज
2.5 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 80% पर्यंत कर्ज
5 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जावर 75% पर्यंत कर्ज
उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे 1 लाख रुपयांची चांदी असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त 85,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.
मूल्यांकन कसे होईल?
सोन्या-चांदीची किंमत ठरवण्यासाठी बँका किंवा NBFC गेल्या 30 दिवसांची सरासरी बंद किंमत किंवा मागील दिवसाची बंद किंमत यापैकी जी कमी असेल ती घेतील. ही किंमत IBJA (India Bullion and Jewellers Association) किंवा मान्यताप्राप्त कमोडिटी एक्सचेंजच्या इश्यू रेटवर आधारित असेल. दागिन्यांमधील दगड किंवा इतर धातूंचे मूल्य यात समाविष्ट केले जाणार नाही.
कर्ज घेण्याची प्रक्रिया:
कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या उपस्थितीत दागिने किंवा चांदीची तपासणी केली जाईल.
बँक मूल्यांकनाचा प्रमाणित अहवाल तयार करेल.
सर्व शुल्क, लिलाव प्रक्रिया आणि परताव्याची अंतिम मुदत कर्ज करारामध्ये स्पष्टपणे नमूद केली जाईल.
गहाण ठेवलेले सोनं किंवा चांदी बँकेच्या सुरक्षित तिजोरीत ठेवले जाईल आणि फक्त अधिकृत कर्मचारीच त्याचे व्यवस्थापन करतील.
वेळोवेळी ऑडिट आणि तपासणी केली जाईल.
कर्जाची परतफेड आणि दागिन्यांची परतफेड:
कर्जाची पूर्ण परतफेड झाल्यानंतर 7 कामकाजाच्या दिवसांच्या आत ग्राहकाला गहाण ठेवलेले दागिने किंवा चांदी परत मिळेल. बँकेच्या चुकीमुळे विलंब झाल्यास ग्राहकाला दररोज 5,000 रुपये नुकसान भरपाई दिली जाईल.
कर्जाची परतफेड न झाल्यास काय होईल?
बँक कर्जदाराचे दागिने किंवा चांदी लिलाव करू शकते.
बँक प्रथम ग्राहकाला लिलावाची नोटीस देईल.
जर ग्राहक संपर्कात नसेल तर सार्वजनिक सूचना जारी केली जाईल आणि एक महिन्याचा कालावधी दिला जाईल.
लिलावासाठी राखीव किंमत सध्याच्या किमतीच्या 90% पेक्षा कमी होऊ शकत नाही.
लिलाव दोनदा अयशस्वी झाला तर राखीव किंमत 85% पर्यंत कमी केली जाऊ शकते.
दोन वर्षांनी न घेतल्यास काय होईल?
कर्जाची परतफेड केल्यानंतर दोन वर्षांनंतरही एखाद्या ग्राहकाने त्याचे सोने किंवा चांदी घेतली नाही, तर बँक त्याला दावा न केलेले तारण घोषित करेल. ग्राहक किंवा त्याच्या वारसांशी संपर्क साधण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली जाईल.
ग्रामीण भागात फायदे:
ही योजना ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विशेष फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक गरज भासल्यास स्थानिक बँका व NBFC कर्ज देऊ शकतील. त्यामुळे लोकांना त्यांच्या मौल्यवान धातूंवरून तात्पुरती आर्थिक मदत मिळेल.
नागरिकांचे फायदे:
आपल्याकडे असलेल्या मौल्यवान वस्तूंवर आर्थिक मदत मिळेल.
कर्जाच्या अटी स्पष्ट असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा गैरफायदा होणार नाही.
बँकेद्वारे सुरक्षित व्यवस्थापनामुळे दागिने सुरक्षित राहतील.
ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांना वित्तीय समावेशाची संधी मिळेल.
सुरक्षा व विश्वासार्हता:
आरबीआयच्या नियमांनुसार, गहाण ठेवलेल्या धातूंचे व्यवस्थापन पूर्णपणे सुरक्षित पद्धतीने केले जाईल. ग्राहकाला सुरक्षिततेची हमी मिळेल आणि लिलाव किंवा अन्य कोणत्याही समस्येपासून संरक्षण मिळेल.
सोने गहाण ठेवून कर्ज घेण्याची ही सुविधा नागरिकांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. ग्रामीण व शहरी भागातील लोकांना आपत्कालीन गरजांमध्ये मदत मिळेल. RBI ने स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी केल्यामुळे हे कर्ज सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने मिळेल.
read also:https://ajinkyabharat.com/5-shocking-naseem-shahchaya-gharaw/

