नवी मुंबई विमानतळावर मराठी तरुणांना नोकऱ्या द्या, नाहीतर उड्डाणं थांबवू : मनसेचा इशारा
नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भरती प्रक्रियेबाबत तीव्र भूमिका घेतली आहे. पक्षाने स्पष्ट इशारा दिला आहे की, “विमानतळावरील नोकऱ्यांमध्ये मराठी युवकांना प्राधान्य न दिल्यास विमान उड्डाणच होऊ देणार नाही.”
मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, या प्रकल्पाच्या चार टर्मिनल्समधून सुमारे एक लाख रोजगारनिर्मिती होणार आहे. परंतु सध्याच्या भरती प्रक्रियेत स्थानिक तरुणांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. “मातीच्या लेकरांना न्याय मिळावा, हीच मनसेची मागणी आहे,” असे काळे म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले की, माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, सीआयडीको आणि विमानतळ प्रशासनात ८० टक्के नोकऱ्या मराठी भाषिकांना देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले होते. मात्र, सध्या हे धोरण पायदळी तुडवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
Related News
तुकाराम मुंढेंचा दणका! Domino’s नंतर Parle Agro गोदामावर 11 तास धाड; लाखोंचा माल जप्त
मुख्यमंत्र्यांनाही अटक करणाऱ्या ‘वाघीण’ IPS रूपा मौदगिल यांची धडाकेबाज कहाणी ; 20 वर्षांत 40 बदल्या!
नाशिकची सिटी लिंक बससेवा विस्कळीत; तब्बल 200 फेऱ्या रद्द, वाहतूक कोंडीचा मोठा फटका
नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपची मोठी फिल्डिंग; रविंद्र चव्हाणांचा 2 दिवसांचा विदर्भ दौरा
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये धारदार शस्त्राने हल्ला;1 आरोपी ताब्यात, प्रकृती स्थिर
शिवसेना फुटीच्या खटल्याला मोठे वळण! कपिल सिब्बलांचा शिंदेंना महाप्रश्न; ‘कुठल्या आधारावर राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली?’
मनोज जरांगेंचा सरकारला मोठा इशारा; 29 ऑगस्टला ‘वर्षा’वर थेट उपोषणाचा निर्धार?
मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर गायकवाड कुटुंबावर दु:खाचा डोंगर; पतीनंतर पत्नीनेही उचललं टोकाचं पाऊल
उद्योगमंत्री उदय सामंत 16 ऑगस्टला घेणार महत्त्वाची बैठक ; चाकणच्या उद्योजकांसाठी मोठी बातमी!
रायगडच्या पालकमंत्रीपदावर भरत गोगावले चा दावा; म्हणाले- “100% अडचण नाही”
शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदावर मोठा सवाल? 5 मुद्द्यांत समजा कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आणि सुप्रीम कोर्टाची भूमिका
अकोला पासपोर्ट कार्यालयाचा ‘महत्त्वपूर्ण विस्तार’ होणार? खासदार अनुप धोत्रे यांची एस. जयशंकरांकडे ठोस मागणी; 1लाख नागरिकांना मोठा दिलासा
मनसेने सरकारवरही निशाणा साधत म्हटले की, नवी मुंबई विमानतळावरील एक लाख नोकऱ्या परराज्यातील स्थलांतरितांना देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच आगरी-कोळी समाजासाठी राबवण्यात येणारे कौशल्य विकास कार्यक्रमही सीआयडीकोने बंद केल्याचा आरोप करण्यात आला. या जमिनीचे मूळ रहिवासी असलेल्या आगरी-कोळी समाजाला नोकऱ्यांमध्ये योग्य स्थान देण्यात आलेले नाही, असा आरोपही मनसेने केला.
मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी इशारा दिला की, “मराठी युवकांना प्राधान्य न दिल्यास पक्ष मोठे आंदोलन उभारेल. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर एकाही विमानाला या विमानतळावरून उड्डाण घेऊ दिले जाणार नाही.”
