बार्शिटाकळी येथे वंचित बहुजन आघाडीची सभा

बार्शिटाकळी

बार्शिटाकळी : “शासनाने शेतकऱ्यांसाठी मदत मंजूर केली; मात्र ती वाटप करण्याचा आदेश अधिकाऱ्यांना दिला नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांची वाहने फोडून काही उपयोग नाही, फोडायचीच असतील तर सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांची फोडा!” — अशा तीव्र शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी (३० ऑक्टोबर) बार्शिटाकळी येथे झालेल्या जाहीर सभेत सत्ताधाऱ्यांवर घणाघात केला.

आंबेडकर म्हणाले, “राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून आधी ३१ हजार कोटी रुपये, त्यानंतर वाढीव ११ हजार कोटी रुपये अशी एकूण ४२ हजार कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली. मात्र, ती रक्कम प्रत्यक्षात वाटप करण्याचा आदेश अद्याप दिलेला नाही. त्यामुळे ही मदत कागदावरच अडकली आहे.” त्यांनी भाजप सरकारवर टीका करताना केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी दोन्ही सरकारे सर्व स्तरांवर अपयशी ठरल्याचे स्पष्ट केले.

सभेला माजी आमदार ॲड. खतीब साहेब, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता अढाऊ, प्रतिभा सिरसाट, बळीराम चिकटे, अनुराधा ठाकरे, आयोजक अशोक कोहर, मंदा अरुणराव देशमुख, तालुका कार्याध्यक्ष गोरसिंग राठोड, ॲड. आशिष देशमुख, ॲड. गोपाल देशमुख, गोपाल चव्हाण, सतीष पवार, आशा ठाकरे, तसेच वंचित आघाडीचे ज्येष्ठ नेते नइमोद्दीन शेख, हाजी सय्यद रागिब, तमिज खान उर्फ गोबा सेठ, शहराध्यक्ष अजहर पठाण, इमरान फ्रूटवाले आणि तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related News

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक कोहर यांनी केले तर संचालन ॲड. सुमीत मोहोड यांनी केले.

read also : https://ajinkyabharat.com/kudos-to-hardworking-students-from-rural-areas/

Related News