हैदराबाद: अमरावतीच्या खासदार आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या नवनीत राणा त्यांच्या विधानामुळे वादात सापडल्या आहेत. राणा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी एमआयएमनं निवडणूक आयोगाकडे केली आहे. राणा यांच्या विधानामुळे दोन समुदायांमध्ये तणाव वाढू शकतो, असं एमआयएमचे प्रवक्ते वारिस पठाण यांनी म्हटलं.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणांनी हैदराबाद लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार माधवी लतांच्या समर्थनार्थ प्रचारसभा घेतली. या सभेतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘१५ सेकंदांसाठी पोलिसांना बाजूला करा. ओवैसी बंधूंना कळणारही नाही ते कुठून आले आणि कुठे गेले,’ असं विधान राणा यांनी सभेत केलं.
‘एक लहान आणि एक मोठा भाऊ आहे. लहान भाऊ म्हणतो, पोलिसांना १५ मिनिटांसाठी हटवा, मग आम्ही दाखवतो आम्ही काय करु शकतो. त्या लहान भाऊला मला सांगायचंय, तुला १५ मिनिटं लागतील. आम्हाला तर केवळ १५ सेकंद लागतील. १५ सेकंदांसाठी पोलिसांना बाजूला करा. लहान-मोठ्याला कळणारही नाही कुठून आले आणि कुठे गेले. आम्हाला केवळ १५ सेकंद पुरेशी आहेत,’ असं राणा म्हणाल्या. हा व्हिडीओ राणा यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी अकबरुद्दीन ओवैसी आणि असदुद्दीन ओवैसी यांना टॅग केलं आहे.
Related News
निक पत्रकार नंदन प्रतिमा शर्मा बोर्डोलोई यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये,
फाटलेल्या नोटांमध्ये अडकलेला एक मृत उंदीर स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ...
Continue reading
नवी दिल्ली :
भारतीय आणि जागतिक इतिहासात १६ एप्रिल ही तारीख अनेक मोठ्या आणि ऐतिहासिक घटनांसाठी ओळखली जाते.
या दिवशी भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास झाला होता, ज्याने देशातील परिव...
Continue reading
तेल्हारा (तालुका प्रतिनिधी):
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने तेल्हारा येथे भव्य
आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. ९ एप्रिल २०२५ रो...
Continue reading
अलीगड (उत्तर प्रदेश),
14 एप्रिल 2025 – अलीगडमधील अतरौली शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये देवी-देवतांचे चित्र असलेल्या
कागदी नैपकिनचा वापर केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.
या ...
Continue reading
राजुरा घाटे येथे आढळली दुर्मीळ पांढरी चिमणी.
मुर्तिजापूर : मुर्तिजापूर तालुक्यातील राजुरा घाटे येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेतील पक्षीमित्र
शिक्षक श्री. मनोज लेखनार हे गेल्या...
Continue reading
नवी दिल्ली:
दिल्ली मेट्रोमध्ये प्रवासादरम्यान काही महिला प्रवाशांनी फर्शावर बसून भजन-कीर्तन सुरू केले.
या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यावर नेटकऱ्यांच्या मि...
Continue reading
गुरुग्राम (हरियाणा):
दिल्लीच्या शेजारील गुरुग्राममधील नामांकित खासगी रुग्णालयात एका एअर होस्टेसवर
वेंटिलेटरवर असतानाच बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पीडित महि...
Continue reading
नवी दिल्ली /
अकोला — "उर्दू ही एक लोकभाषा आहे, ती कोणत्याही विशिष्ट धर्माशी जोडलेली नाही.
तसेच, मराठीबरोबर उर्दूचा वापर करण्यावर कोणताही कायदेशीर प्रतिबंध नाही,
" अशा स्पष्ट शब...
Continue reading
नवी दिल्ली / नाशिक:
भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.
आता रेल्वे प्रवासादरम्यानही एटीएममधून पैसे काढणे शक्य होणार आहे.
देशात प्रथमच चालत्या गाडीत एटीएम...
Continue reading
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अमरावती विमानतळ आणि सेवा लोकार्पण; 18 एप्रिलपासून नियमित सेवा सुरू
अमरावती (18 एप्रिल 2025):
विदर्भातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
मुंबई-अमरावती...
Continue reading
महानगरपालिकेचे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन
अकोला (15 एप्रिल 2025) –
अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा जलप्रकल्पातील साठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे.
त्यामु...
Continue reading
नाशिक (16 एप्रिल 2025) – नाशिक महानगरपालिकेने अनधिकृत ठरवलेल्या
काठे गली सिग्नल परिसरातील सातपीर दर्गा हटविण्याच्या कारवाईसाठी गेलेल्या महापालिका
आणि पोलिस पथकावर काल रात्री दगडफ...
Continue reading
नवनीत राणा यांच्या विधानावरुन एमआयएमचे प्रवक्ते वारिस पठाण यांनी पलटवार केला आहे. ‘भाजपचे नेते निवडणूक सुरु असताना अशी विधानं करत आहेत. यामुळे नियमांचं, आचारसंहितेचं उघडपणे उल्लंघन होत आहे. निवडणूक आयोगानं या प्रकरणी कठोर कारवाई करायला हवी. या विधानामुळे दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो,’ असं पठाण म्हणाले.
नवनीत राणा यांच्यासारखी विधानं मी केली असती, तर आज मी तुरुंगात असतो, असं पठाण यांनी म्हटलं. ‘१५ मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला करा, असं विधान अकबरुद्दीन ओवैसींनी केलं होतं. त्यानंतर ते स्वत: पोलिसांच्या स्वाधीन झाले. ४० ते ४२ दिवस तुरुंगात राहिले. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला. मग त्यांनी न्यायालयात लढा दिला. मग या प्रकरणातून त्यांची सुटका झाली. आता तसंच विधान राणांनी केलं आहे. निवडणूक आयोग त्यांच्यावर कारवाई कधी करणार? त्यांना तुरुंगात कधी पाठवणार?, असे प्रश्न पठाण यांनी उपस्थित केले आहेत.