पुणे : माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसऐवजी (शरदचंद्र पवार पक्ष) महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला जप्तीच्या कारवाईतून मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सहकारी बँकेने थकबाकीच्या कारणावरून पंढरपुरातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कारवाई केली. ही कारवाई बेकायदा आणि लहरीपणाची असल्याची टिप्पणी करीत कारखान्याची गोदामे सीलमुक्त करून पाच मेपर्यंत त्यांचा ताबा पुन्हा कारखान्याकडे देण्याचे आदेश पुण्याच्या कर्ज वसुली लवादाने दिले.
माढ्यात विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार पक्ष) धैर्यशील मोहिते पाटील यांना उतरवले आहे. मोहिते पाटील यांना श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी पाठिंबा जाहीर केला होता. या पार्श्वभूमीवर शिखर बँकेने चारशे कोटी रुपयांच्या थकबाकीचे कारण देऊन अभिजित पाटील यांच्या कारखान्याची तीन गोदामे सील केली. त्यामध्ये सुमारे १४ हजार क्विंटल साखर अडकून पडली होती. या कारवाईनंतर अभिजित पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन लगेचच माढा आणि सोलापूर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला.
या कारवाईच्या विरोधात कारखान्याने कर्ज वसुली लवादाकडे धाव घेऊन अंतरिम दिलासा देण्याची मागणी केली. त्यावर शिखर बँकेने हा अर्ज फेटाळण्याची मागणी केली. कारखान्याकडे मोठी थकबाकी असून, ती परत करण्याचे निर्देश कारखान्याला द्यावेत, अशी मागणी बँकेने केली. लवादाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. वास्तविक, हा वाद न्यायप्रविष्ट असून, कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार नाही असे बँकेच्या वकिलांनी मागील तारखेला सांगितले होते. तरीही बँकेने कारखान्याचे साखर साठविलेले तीन गोदाम सील केले. ही कृती अयोग्य आणि लहरीपणाची आहे, असे नमूद करून गोदामे सीलमुक्त करून पाच मेपर्यंत त्यांचा ताबा पुन्हा कारखान्याकडे देण्याचे आदेश दिले. या राजकीय घडामोडींमुळे माढ्यातील निवडणुकीत आणखी रंगत भरली आहे.
Related News
अजितदादांच्या मृत्यूनंतर ‘कारस्थान’चा आरोप; सुनिल तटकरेंचा इशारा, रोख नेमका कोणाकडे?
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची जोरदार फेरी सुरू झाली आहे. राष्ट्रवा...
Continue reading
नाशिकमधील अशोक खरात प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. भोंदूबाबा म्हणून ओळखला जाणारा आणि अनेक महिलांवर अत्याचार केल्याचे आरोप असलेला अशोक खरात याच्या...
Continue reading
अशोक खरात प्रकरणात राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र; रुपाली ठोंबरे पाटील यांची रुपाली चाकणकरांच्या अटकेची मागणी
महाराष्ट्रात गाजत असलेल्या अशोक खरात प्र...
Continue reading
अशोक खरात अजितदादांवर काळी जादू करायचा?” राष्ट्रवादी नेत्याच्या दाव्यानं राज्यात खळबळ
नाशिकमधील कथित भोंदू ज्योतिषी अशोक खरात प्रकरणाने आता राज्याच्...
Continue reading
भाजपाला सर्वात मोठा धक्का! छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी दोन्ही शिवसेना एकत्र येणार?
भाजपाला मोठा धक्का : छत्रपती संभा...
Continue reading
बारामती : अजित पवारांच्या आकस्मिक निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीचा प्रश्न सध्या राज्यातील राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनला आ...
Continue reading
पार्थ पवार राज्यसभेत पदार्पण: सुप्रिया सुळे यांचा मोलाचा सल्ला
महाराष्ट्र राजकारणात एक महत्त्वाची घडामोड घडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि बारामतीचे माजी खासद...
Continue reading
शरद पवार राज्यसभा निवडणूक 2026 साठी महाविकास आघाडीने घेतलेले निर्णायक पाऊल आणि काँग्रेसची राजकीय अट, अजित-पवार गटांच्या विलिनीकरणाचा मुद्दा, उद्धव ठाक...
Continue reading
NCP Merger बाबत जयंत पाटील यांनी स्पष्ट वक्तव्य दिले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. अजित पवार यांच्या न...
Continue reading
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला; शरद पवार यांची नावाची घोषणा
राज्यसभेच्या आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाड...
Continue reading
Parth Pawar News : 11 Shocking Developments in NCP Politics – पार्थ पवार आणि राष्ट्रवादीमध्ये मोठी राजकीय चर्चा
Parth Pawar News: सध्या Parth Pawar यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रे...
Continue reading
राज्यपालांच्या अभिभाषणात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख नसल्यामुळे जयंत पाटील विधानसभेत नाराजी व्यक्त करत, राज्य मंत्रिमंडळाला मुद्देसूद...
Continue reading