अहमदनगर : ‘महाराष्ट्रात झालेले फोडाफोडीचे राजकारण जनतेला आवडले नाही. ईडी सीबीआयसह केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, न्यायव्यवस्थेवरील दबाव सर्वत्र अस्थिरता यामुळे देशात भाजपा विरोधी मोठी लाट आहे. राज्यातील महायुतीचे सरकार जनतेला मान्य नसल्याने महाविकास आघाडीला मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीला ४० पेक्षा जागा नक्की मिळतील,’ असा विश्वास काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारासाठी संगमनेरमध्ये आयोजित सभेत थोरात बोलत होते. थोरात म्हणाले, पंतप्रधानांनी भाषण करताना दहा वर्षात केलेली विकास कामे आणि पुढील पाच वर्षांत करावयाची कामे याचा अहवाल जनतेला दिला पाहिजे. मात्र सध्याचे पंतप्रधान हे धर्माचे राजकारण करत आहेत. देशात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. न्यायव्यवस्था दबावात आहे. बेरोजगारी आणि महागाई वाढली आहे. मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवर अत्याचार झाला आहे. देशासाठी ऑलिम्पिक जिंकणाऱ्या महिला खेळाडूंवर अन्याय झाल. मात्र पंतप्रधानांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. सर्वत्र अस्थिरता आणि अनागोंदी आहे. देशाच्या इतिहासात भाजपचा कालखंड हा काळा इतिहास म्हणून लिहिला जाईल. त्यांनी कितीही ४०० पारचे नारे दिले तरी २०० चा आकडाही त्यांना गाठता येणार नाही, असेही थोरात म्हणाले.
वंचितला मतदान करणे म्हणजे भाजपला मदत करणे
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासंबंधी थोरात म्हणाले, ‘वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांना काँग्रेसने मोठी संधी दिली. आपल्याकडे कायम त्यांचा सन्मान होत होता. राज्यात आणि देशपातळीवरही काम करण्याची संधी होती. शिर्डी मतदारसंघ काँग्रेसला मिळावा यासाठी आपण मोठा प्रयत्न केला. हे सर्वांना माहिती आहे. मात्र रूपवते यांनी काँग्रेस सोडणे हे अत्यंत चुकीचे आणि दुःखदायक आहे. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र या. वंचितला मतदान करणे म्हणजे भाजपला मदत करणे, असे ठरणार असल्याने मतदारांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा,’ असे आवाहनही त्यांनी केले.
Related News
मोठी राजकीय खळबळ! कॅबिनेट बैठक सोडून एकनाथ शिंदे थेट शरद पवारांच्या भेटीला
राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून, उपमुख्यमंत्री
Continue reading
रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार? भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, फडणवीस-शिंदे यांच्या नावाने कागदपत्रे असल्याचा अंबादास दानवेंचा दावा
छत्रपती संभा...
Continue reading
Sharad Pawar : फाईव्ह स्टार हॉटेलमधील बैठकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा; शरद पवार मोठा निर्णय घेणार?
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडीं...
Continue reading
राजन साळवींबाबत प्रमोद जठारांची कौतुकाची पोस्ट; वाढदिवसापूर्वीच राजकीय चर्चांना उधाण
रत्नागिरी : महाराष्ट्राच्या राजकारणात सोशल मीडियावरील एका पोस...
Continue reading
पश्चिम बंगालच्या 3 राज्यसभा जागांवर पोटनिवडणुका
पोटनिवडणुक : देशातील अनेक भागांमध्ये मान्सूनचा जोर कायम असतानाच पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी हालचाल झाली आहे. राज्यसभेच्या तीन र...
Continue reading
डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त PM मोदींचे मोठे विधान; कलम 370 रद्द करणे हीच खरी श्रद्धांजली, जाणून घ्या 7 महत्त्वाचे मुद्दे
भारतीय जनसंघाचे संस्थापक
Continue reading
अंबरनाथ नगरपरिषदेच्या सभेत शिंदे शिवसेनेचे उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी 'थोडा भ्रष्टाचार झालाच पाहिजे' असे वादग्रस्त...
Continue reading
आमदार धीरज लिंगाडेंची पहिली स्पष्ट प्रतिक्रिया
धीरज लिंगाडे : राज्यातील राजकारणात सध्या मोठ्या घडामोडींना वेग आला असून पक्षांतर, बंडखोरी आणि राजकीय दाव्यांमुळे वातावरण तापले आहे. ...
Continue reading
Parliament Monsoon Session २० जुलै ते १३ ऑगस्ट २०२६ दरम्यान होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पक्षफुटी, १३१वे घटनादुरुस्ती विधेय...
Continue reading
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी पा...
Continue reading
पंजाब काँग्रेसमध्ये खळबळ! अमित शहांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण; काँग्रेस फुटणार की केवळ राजकीय योगायोग?
पंजाबच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील का...
Continue reading