मुंबई – मराठा समाजासाठी आरक्षणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे
नेते शरद पवार यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे.
मुंबईतील आझाद मैदान येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या
आंदोलनाबाबत बोलताना त्यांनी म्हटले की,
“72 टक्के आरक्षण तामिळनाडूमध्ये (Tamilnadu Reservation) होऊ शकते.
घटनेत बदल करता येऊ शकतो.
घटनेत बदल करण्याची भूमिका घेतली तरच मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न सुटू शकतो.”
हे वक्तव्य त्यांनी अहिल्यानगर येथील कार्यक्रमात केले.
त्यांच्या या वक्तव्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
अजित पवार म्हणाले:
“जे ही सुचना करतायत ते अनेक वर्षे सत्तेत होते.
दहा वर्षे केंद्र सरकारमध्ये होते. ते पुजनीय आहेत, वंदनीय आहेत.
मला जास्त खोलात जायला लाऊ नका.”
शरद पवारांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांच्या परिस्थितीवरही भर दिला.
त्यांनी म्हटले की, शेतकऱ्यांच्या जमिनी दिवसेंदिवस कमी होत आहेत
आणि विकासाच्या नावाखाली शेतीवर दबाव वाढतो आहे.
त्यामुळे शेतीत तांत्रिक पद्धतींचा आणि AI चा वापर करण्याची गरज आहे.
तसेच रयत शिक्षण संस्था या क्षेत्रात प्रयत्न करत असल्याचे
त्यांनी सांगितले आणि जनतेला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांना मराठा समाजाला
ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले होते.
अशा पार्श्वभूमीवर शरद पवारांचे वक्तव्य सामाजिक व राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जात आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/murtijapuramadhye-national-sports-day-and-major-dhyanchand-jayanti-enthusiast/