हिंदी जीआरवर सरकारची माघार; ठाकरेबंधूंच्या एकतेमुळे मराठी ताकद उभी – संजय राऊतांचा दावा

हिंदी जीआरवर सरकारची माघार; ठाकरेबंधूंच्या एकतेमुळे मराठी ताकद उभी – संजय राऊतांचा दावा

मुंबई | २७ जून २०२५ – हिंदी सक्तीच्या जीआरवरून सरकारनं मागे हटल्याचा

दावा शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी केला आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, त्यामुळे मराठी माणसाची ताकद सरकारला दिसली,”

Related News

असे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

राऊत म्हणाले की, “मी राज ठाकरे यांच्याशी बोललो आहे.

५ जुलै रोजीचा मोर्चा आता विजयी मेळावा म्हणून होणार आहे.

यामध्ये ठाकरे बंधूंसह इतर मराठी हितसंबंधी घटक सहभागी होतील.

“मराठी अस्मितेच्या लढ्यात ही एकजूट निर्णायक ठरली,”

असे सांगत राऊत यांनी राज्य सरकारवर मराठी जनतेच्या दबावाखाली निर्णय मागे घेतल्याचा आरोप केला.

Read Also : https://ajinkyabharat.com/hindi-saktivarun-raj-thackeray-aggressive-jadhav-yeu-dehs-konitri-amhi-khapavun-ghenar-naahi/

Related News