अहमदाबाद – एअर इंडिया विमान अपघातापूर्वीच त्यामध्ये तांत्रिक बिघाड दिसत होता,
असा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. प्रवासी आकाश वत्स यांनी या विमानात बसलेला
असताना एक व्हिडीओ शूट केला होता, ज्यामध्ये स्पष्टपणे दिसतं की विमानात एसी बंद होता,
Related News
“पाकिस्तानचा ‘डबल गेम’ उघड! 6 गुप्त मार्गांनी अमेरिकेला मोठा धक्का”
PIN शिवाय पेमेंटची नवी क्रांती; बायोमेट्रिकद्वारे बँकिंग अधिक स्मार्ट
उन्हाळ्यात ऊसाचा रस पिताय? डॉक्टरांचा गंभीर इशारा समोर
Arti Singh ने 20 दिवसांत 5 किलो वजन कमी कसं केलं? जाणून घ्या तिचा डाएट
Natasha Poonawalla चा हटके लूक व्हायरल; कांथा साडीत दिला ग्लॅमरस टच
स्क्रीन चालत नव्हत्या आणि केबिन क्रू बटणही काम करत नव्हतं.
व्हिडीओतून उघड!
आकाश वत्स यांनी त्यांच्या मोबाईलवरून रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमध्ये प्रवासी त्रस्त असल्याचे दिसते.
अनेकजण मासिकांपासून वारा घेताना, घामाघूम अवस्थेत, तक्रार करताना दिसतात.
विमानाचा इतिहास
बोइंग 787 ड्रीमलाइनर
242 प्रवासी – यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही समावेश असल्याचं वृत्त
दिल्लीहून अहमदाबादला आल्यावर काही वेळातच लंडनसाठी टेकऑफ
टेकऑफनंतर 15 मिनिटांतच अपघात
अपघाताची भीषणता
विमान अहमदाबाद हॉर्स कॅम्पजवळील हॉस्टेल इमारतीवर आदळले.
संपूर्ण विमान आगीनं वेढलं, परिसरातील इमारतींनाही नुकसान.
यंत्रणांवर प्रश्नचिन्ह!
या नव्या व्हिडीओमुळे एअर इंडियाच्या सुरक्षा यंत्रणांवर व देखरेखीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
आधीच निदर्शनास आलेल्या बिघाडांकडे दुर्लक्ष करून विमान उड्डाण केल्याचा गंभीर आरोप आता होऊ शकतो.
NDRF, आर्मी आणि फायर ब्रिगेड घटनास्थळी मदत कार्यात गुंतली आहे. मृतांचा अधिकृत आकडा अद्याप स्पष्ट नाही,
मात्र प्राथमिक अंदाजानुसार सर्व 242 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/vadhivarasah-gharache-three-letters-flying/
