पीओपी गणेशमूर्ती विसर्जनासाठी फडणवीस सरकार नवे धोरण आणणार!

पीओपी गणेशमूर्ती विसर्जनासाठी फडणवीस सरकार नवे धोरण आणणार!

मुंबई : पीओपी गणेशमूर्ती विसर्जनासाठी फडणवीस सरकार नवे धोरण आणणार आहे.

त्यामुळे राज्य सरकारच्या या निर्णयाकडे सर्व गणेशोत्सव मंडळाचे लक्ष लागले आहे.

मुंबईसह राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे.

Related News

पीओपी मूर्ती विसर्जनासाठी फडणवीस सरकार नवे धोरण आणणार आहे.

या आठवड्यात मूर्ती विसर्जनासाठी शासनाकडून नवे धोरण आणण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गणेशोत्सवपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस)

गणेश मूर्तींवरील बंदी आता उठवण्यात आली आहे. या निर्णयामुळे मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या धोरणात लालबागचा राजा, मुंबईचा राजा आणि इतर मंडळांना दिलासा देण्यात येणार आहे.

गणेशोत्सव मंडळांना उंच पीओपी गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करता येणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने पीओपी गणेश मूर्ती तयार करणे आणि विक्री करण्यावर असलेली बंदी उठवली आहे.

मात्र, या मूर्तींचे विसर्जन हे नैसर्गिक जलस्रोतांऐवजी कृत्रिम तलावांमध्येच करण्याची अट कायम राहणार आहे.

या निर्णयावर न्यायालयात दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली आहे. न्यायालयाने राज्य सरकारला तीन आठवड्यांच्या आत एक

समिती नेमून पीओपी मूर्तींच्या विसर्जनासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातील,

त्याविषयी सविस्तर आणि सखोल माहिती न्यायालयासमोर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

या निर्णयानंतर आता घरगुती गणपतीसाठी बनवलेल्या छोट्या पीओपी गणेश मूर्ती साकारण्यास आणि गणेशोत्सव मंडळांमध्येही

अशा मूर्ती विराजमान करण्यास कोणताही अडथळा राहिलेला नाही. मात्र, पर्यावरणपूरक विसर्जनाच्या अटींचे पालन अनिवार्य राहील.

या निर्णयामुळे अनेक मूर्तिकारांना दिलासा मिळाला आहे.

Read Also :  https://ajinkyabharat.com/amhi-bolala-khambir-ajit-pavranni-keli-mitkari-aani-hakenchi-kanughadani/

Related News