अकोट
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी व आदिवासी बहुल भाग असलेले गट ग्राम पंचायत रामापूर
येथे शासनाने गेल्या २५ ते ३० वर्षा पासून लाखो रुपये खर्च करून तलाठी निवास कार्यालय बांधले आहे.
Related News
कोंडोलीत नानाजी देशमुख कृषी संजवनी प्रकल्पाचे भव्य उद्घाटन; ग्रामस्तरावर सूक्ष्म नियोजनाला सुरुवात
गोपनीय माहितीवरून कारवाई; बाळापुरात गोवंशांची निर्दय वाहतूक उघड, 3 गोवंशांना दिलं जीवनदान
व्यापाऱ्यांच्या माल ओट्यावर व शेतकऱ्यांचा माल उघडयावर मंगरूळपीर कृषी उत्पन्न बाजार समीतीत प्रकार
घोडेगाव तेथे तुफान वादळी वाऱ्याने कित्येकाचे संसार उघड्यावर
अहमदाबाद विमान अपघातात 240 हून अधिकांचा मृत्यू; अकोल्याची ऐश्वर्या तोष्णीवाल थोडक्यात बचावली!
सावरगाव ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार
मोठा खुलासा! क्रॅश झालेल्या विमानात आधीच होती बिघाडाची लक्षणं;
वादळीवारासह घराचे तीन पत्रे उडाले जखमींना तात्काळ निंबा येथे दवाखान्यात दाखल
मोठा खुलासा! अहमदाबाद विमान अपघातामागे पक्ष्यांची धडक; दोन्ही इंजिन बंद, 100 हून अधिकांचा मृत्यू
दहीहांडा येथे झालेल्या अवकाळी पावसामुळे राहत्या घरांचे मोठे नुकसान
अजित पवार यांचे भाषण अर्धवट थांबले; वादळी वाऱ्यामुळे घेतली कार्यकर्त्यांची रजा
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हेही प्रवासी म्हणून उपस्थित
मात्र तिथे कुठल्याही सोय सुविधा आज पर्यंत उपलब्ध करून दिल्या नसल्याने ते तलाठी निवास कार्यालय धूळख्यात पडलेले असल्याचे चित्र दिसत आहे.
त्यामुळे त्या तलाठी निवास कार्यालयाच्या आजूबाजूला गावातीलच काही लोकांनी इंधन, काळी कचरा, गुरेढोरे,
बकऱ्या बांधण्यासाठी खुठे रोवून अतिक्रमण केले आहे. या बाबत रामापूरचे तलाठी व गावातूनच या
अतिक्रमण बद्दल लेखी तक्रार सुध्दा करण्यात आली होती. या बाबत वेळोवेळी वृत्त प्रकाशित करण्यात आले होत.
त्या प्रमाणे ग्राम पंचायत यांनी दखल घेऊन संबंधित अतिक्रमण धारक यांना ग्राम पंचायत मार्फत नोटीसेस बजावून
आपआपले अतिक्रमण सात दिवसाच्या आत काढून मोकळे करावे अन्यथा आपल्या विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात
येईल याची नोंद घ्यावी असे कळविले होते. त्या वरून अतिक्रमण धारक यांनी आपले अतिक्रमण स्वतःहून काढून मोकळे केले होते.
मात्र या तलाठी निवास कार्यालयात लाईट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, टेबल, खुर्च्या, कोणत्याही सोय सुविधा
उपलब्ध नसल्याने तलाठी यांना कार्यालय उघडून हजर राहणे बाबत मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.
म्हणूनच येथे तलाठी हजर राहत नसल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळेच तेथे वेळोवेळी अतिक्रमण सुध्दा होत आहे.
तरी शासनाने ताबडतोब दखल घेऊन रामापूर येथील तलाठी निवास कार्यालय समोरील अतिक्रमण ग्राम पंचायत यांना
काढून मोकळे करण्याचे आदेश द्यावे.व तेथे तात्काळ सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या.
म्हणजे जेणे करून तेथे तलाठी हे कार्यालय उघडून तेथे रुजू होतील व शेतकऱ्यांना,शेतमुजरांना,
शाळकरी विद्यार्थ्यांना लागणारे महत्वाचे कागदपत्र हे अकोटला न
जाता गावातिलच तलाठी निवास कार्यालयात उपलब्ध करून देतील अशी मागणी होत आहे.
रामापूर येथील तलाठी निवास कार्यालयाकडे शासनाचे दुर्लक्ष,सोईसुविधा उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी.
Read Also : https://ajinkyabharat.com/udya-chief-minister-devendra-fadnavis-o-akola-dahyawar/