तेल्हारा शहरातील घरकुल लाभार्थ्यांना उर्वरित टप्प्यांचे पैसे लवकर देण्याची मागणी भाजप शिष्टमंडळाची

तेल्हारा शहरातील घरकुल लाभार्थ्यांना उर्वरित टप्प्यांचे पैसे लवकर देण्याची मागणी भाजप शिष्टमंडळाची

तेल्हारा, दि. ३ (ता.प्र.) –

तेल्हारा शहरातील घरकुल लाभार्थ्यांचे बहुतांश बांधकाम पूर्ण झाले असून काही

लाभार्थ्यांचे बांधकाम निधीअभावी अर्धवट राहिले आहे. त्यामुळे उर्वरित टप्प्यांचे पैसे तातडीने वितरित करावेत,

Related News

अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी सतीश गावंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अनेक लाभार्थ्यांनी घरकुलासाठी नातेवाईक,

दुकानदार आणि इतरांकडून कर्ज घेतले आहे. काही लाभार्थी भाड्याच्या खोलीत राहत असून त्यांच्यावर

आर्थिक भार वाढत आहे. त्यामुळे घरकुल योजनेतील उर्वरित निधी तत्काळ वितरित करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

या निवेदनावर माजी तालुकाध्यक्ष गजानन गायकवाड, माजी न.प. सदस्य सुनिल राठोड,

माजी तालुका सरचिटणीस सतीश जयस्वाल, भाजयुमो तालुकाध्यक्ष गणेश इंगोले, पुरुषोत्तम जायले,

गजानन हागे, अंकुश सपकाळ, सचिन सपकाळ यांच्यासह अनेकांची स्वाक्षरी आहे.

दरम्यान, या संदर्भात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश गावंडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की,

“घरकुल योजनेसाठी काही दिवसांपूर्वीच निधी प्राप्त झाला आहे.

प्रक्रिया पूर्ण होताच लाभार्थ्यांना निधीचे वाटप लवकरच सुरू करण्यात येईल.”

शहरातील अनेक कुटुंबांचे स्वप्न असलेल्या घरकुल योजनेंतर्गत लवकरच

अपेक्षित निधी मिळेल, अशी आशा लाभार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/rohit-pawarrana-amol-mitkari-yancha-tola-helicoptermadhun-landed-ground-levah-or/

Related News