बार्शीटाकळी (अकोला) : गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या अवकाळी
पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घातली आहे.
बार्शीटाकळी तालुक्यातील मांगुळ येथील अल्पभूधारक शेतकरी रमेश काकड यांच्यावर तर संकट कोसळलं आहे.
Related News
जय श्रीराम जय गोमाता | गोवंश तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला
मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीलाच अपमान कारक वागणूक
मूर्तिजापूर इंटरनॅशनल स्कूलमध्ये बाल वारकऱ्यांची दिंडी, रिंगण सोहळ्याने भाविक मंत्रमुग्ध
आषाढी एकादशी विशेष बातमी | अकोला ३२० वर्षांच्या परंपरेचे साक्षीदार विठ्ठल मंदिरात पहाटे महापूजा | ९२ वर्षांची अखंड हरिनाम परंपरा
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
त्यांनी चार एकर शेतात हळद आणि कांद्याची लागवड केली होती,
मात्र काढणीस तयार असलेलं पीक पावसामुळे अक्षरशः सडून गेलं.
रमेश काकड यांनी कांदा आणि हळद साठवणीसाठी खास व्यवस्था केली होती.
मात्र अचानक पडलेल्या पावसामुळे संपूर्ण साठवणूक बिघडली आणि त्यांचे अंदाजे १.५ ते २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
विशेष म्हणजे, इतकं मोठं नुकसान होऊनही अजूनपर्यंत कृषी विभाग वा तालुका
प्रशासनाकडून कोणीही पंचनामा करण्यासाठी आलेले नाहीत. त्यामुळे शेतकरी अधिकच नैराश्यात सापडला आहे.
“सरकारने त्वरीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनीची पाहणी करून योग्य नुकसानभरपाई द्यावी,”
अशी जोरदार मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
सरकारकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जाहीर आश्वासने दिली जात असतानाच,
प्रत्यक्षात अद्यापही पंचनाम्याचे काम सुरू न झाल्याने, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/paturamidhye-gavansh-smuggling-ughadkis/