🔹 मुंबई | विशेष प्रतिनिधी
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकामुळे सध्या
राज्याच्या राजकारणात नवा वाद उफाळून आला आहे.
Related News
Anupamaa 21 February 2026 Update : 5 थरारक ट्विस्ट्स ज्यांनी कोठारींचा आनंद ढवळून टाकला!
नारळाचे पाणी पिण्याचे 6 फायदे: वजन कमी आणि आरोग्य सुधारण्यासाठी!
‘O’Romeo ने आठवड्याच्या आठव्या दिवशी कमावले 2.25 कोटी; ‘अस्सी’ सुरूवातीस फक्त 1 कोटी!
Bigg Boss Marathi 6 Voting Trends : या आठवड्यात धोक्यात कोण?
“AI दिल्लीची वाहतूक सुटवू शकत नाही” – ऋषी सुनक
AI क्रांती भारतात: मायक्रोसॉफ्टचा 50 अब्ज डॉलर्सचा प्रकल्प, मध्यमवर्गीयांसाठी काय बदलणार?
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप चुकीचा – महावितरणकडून स्पष्टता
वजन कमी करायचे आहे का? गव्हाच्या पिठाऐवजी या आरोग्यदायी पिठांचा समावेश करा
अमेरिका-इराण संघर्ष: युद्ध झाले तर कोण जिंकणार?
पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना शरद पवार आणि बाळासाहेब
ठाकरे यांनी मदत केली होती, असा उल्लेख करून राऊतांनी खळबळ उडवून दिली आहे.
या पुस्तकावर भाजपकडून जोरदार प्रतिक्रिया उमटत असून चंद्रशेखर बावनकुळे यांनी राऊतांवर जहरी टीका केली आहे.
“पुस्तकाचं नाव ‘नरकातला स्वर्ग’ न ठेवता ‘नरकातला राऊत’ असं असायला हवं होतं”, असा घणाघात त्यांनी केला.
इतकंच नव्हे, तर “मी संजय राऊतांना पत्र लिहून पुस्तकाचं नाव बदलण्याची मागणी करणार आहे”, असंही बावनकुळे म्हणाले.
यापूर्वी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही राऊतांवर टीका करत “गटारातील अर्क असं नाव त्या लेखकाला शोभेल”,
असं वक्तव्य केलं होतं. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक टोला लगावत म्हटलं होतं की,
“कथा, कादंबऱ्या आणि बालवाड्मय वाचायचं वय माझं आता राहिलेलं नाही.”
राजकीय वर्तुळात संजय राऊतांच्या पुस्तकातील मजकूर आणि त्यावर उमटलेल्या प्रतिक्रिया यामुळे
वातावरण चांगलेच तापले आहे. पुढील राजकीय घडामोडींवर आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/operation-sinduranantar-bharatachi-tayari-anakhi-aggressor/
