🔹 मुंबई | विशेष प्रतिनिधी
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकामुळे सध्या
राज्याच्या राजकारणात नवा वाद उफाळून आला आहे.
Related News
ट्रम्प यांचा भारतासाठी 5 मोठे संदेश; चीन-पाकिस्तान हादरले
-
By
Vivek Raut
iPhone 18 Pro सिरीजचे मोठे लीक्स समोर: डिझाइनपेक्षा AI आणि परफॉर्मन्सवर भर
उन्हाळ्यात 40°C तापमानात पचन बिघडतंय? जाणून घ्या सोपे किचन स्वॅप्स
प्रेम कमी होण्याआधी मेंदू काय संकेत देतो? मानसशास्त्राचा धक्कादायक खुलासा
Monsoon Update 2026 : 75 ते 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका; तज्ज्ञांचा धक्कादायक इशारा, शेतकऱ्यांसाठी 7 महत्त्वाच्या सूचना
US-Iran संघर्षात मोठी दिलासादायक घडामोड! पुढील 30 दिवसांत होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याची शक्यता
पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना शरद पवार आणि बाळासाहेब
ठाकरे यांनी मदत केली होती, असा उल्लेख करून राऊतांनी खळबळ उडवून दिली आहे.
या पुस्तकावर भाजपकडून जोरदार प्रतिक्रिया उमटत असून चंद्रशेखर बावनकुळे यांनी राऊतांवर जहरी टीका केली आहे.
“पुस्तकाचं नाव ‘नरकातला स्वर्ग’ न ठेवता ‘नरकातला राऊत’ असं असायला हवं होतं”, असा घणाघात त्यांनी केला.
इतकंच नव्हे, तर “मी संजय राऊतांना पत्र लिहून पुस्तकाचं नाव बदलण्याची मागणी करणार आहे”, असंही बावनकुळे म्हणाले.
यापूर्वी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही राऊतांवर टीका करत “गटारातील अर्क असं नाव त्या लेखकाला शोभेल”,
असं वक्तव्य केलं होतं. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक टोला लगावत म्हटलं होतं की,
“कथा, कादंबऱ्या आणि बालवाड्मय वाचायचं वय माझं आता राहिलेलं नाही.”
राजकीय वर्तुळात संजय राऊतांच्या पुस्तकातील मजकूर आणि त्यावर उमटलेल्या प्रतिक्रिया यामुळे
वातावरण चांगलेच तापले आहे. पुढील राजकीय घडामोडींवर आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/operation-sinduranantar-bharatachi-tayari-anakhi-aggressor/