नवी दिल्ली | १२ मे :
पहलगाम येथे झालेल्या पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेला
“ऑपरेशन सिंदूर” हा निर्णय अत्यावश्यक होता, असं स्पष्ट करताना भारतीय लष्कराचे
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स (DGMO) लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सोमवारी स्पष्ट भूमिका मांडली.
राजीव घई म्हणाले, “पाकिस्तानकडून वार होणार याची पूर्ण शक्यता होती आणि त्यासाठी आमची
एअर डिफेन्स सिस्टीम दगडासारखी भक्कम होती. आमचं संरक्षणजाळं भेदता येणं शक्य नव्हतं.
आम्ही आधीच तयारी केली होती.”
त्यांनी सांगितलं की, गेल्या काही महिन्यांतील खोरी मंदिराजवळच्या यात्रा हल्ला,
आणि एप्रिल २०२५ मध्ये पहलगाम येथील पर्यटकांवरील हल्ला, हे दहशतवादाच्या बदललेल्या स्वरूपाची उदाहरणं आहेत.
“पहलगामपर्यंत पापाचा घडा भरला होता, आणि त्यानंतर आमचं प्रत्युत्तर अपरिहार्य होतं,” असं ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेत एअर ऑपरेशन्सचे डायरेक्टर जनरल एअर मार्शल ए. के. भारती यांनीही भूमिका मांडली.
ते म्हणाले, “आमची लढाई केवळ दहशतवाद्यांविरोधात होती.
पण दुर्दैवाने पाकिस्तानी लष्कराने दहशतवाद्यांचा पाठिंबा घेतला आणि ही लढाई स्वतःवर ओढवून घेतली.”
भारतीय हवाई दलाने ७ मे रोजी पाकव्याप्त काश्मीरमधील आतंकी तळांवर अचूक हवाई हल्ले केले.
भारती म्हणाले, “पाकिस्तानची कोणतीही मिसाईल आमच्या संरक्षण जाळ्याला भेदू शकली नाही.
आमच्या हल्ल्यांमुळे केवळ दहशतवादीच नाही तर त्यांना पाठिंबा देणाऱ्या यंत्रणांनाही मोठं नुकसान झेलावं लागलं.”
अखेर, ९ ते १० मेच्या रात्री पाकिस्तानने भारताच्या एअर लॉजिस्टिक ठिकाणांवर हल्ल्याचा प्रयत्न केला,
पण तो अपयशी ठरला, अशी माहितीही ले. जनरल घई यांनी दिली.
Read Also :
https://ajinkyabharat.com/neet-chief-tayari-karanya-both-vidyadhyanchi-suicide/