इस्लामाबाद/नवी दिल्ली | ८ मे २०२५ – भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण गडद झालं असून,
त्याचा थेट परिणाम पाकिस्तानच्या संसदेतही दिसून आला. आजच्या सत्रात पाकिस्तानचे खासदार
ताहिर इक्बाल हे संसदेत भाषण करताना अचानक भावनाविवश झाले आणि फूटाफूट रडू लागले.
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
त्यांनी आवाहन केलं – “या खुदा, आज बचा लो… अल्लाह आमच्या देशाची हिफाजत करो.”
भारतानं पहलगाममधील २६ पर्यटकांच्या निर्घृण हत्येनंतर पाकिस्तानमधील दहशतवादी
तळांवर जोरदार कारवाई करत कठोर संदेश दिला आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या तडाख्यामुळे पाकिस्तानच्या लष्करात आणि राजकारणात संभ्रम आणि घबराट निर्माण झाली आहे.
पाकिस्तानकडून मिसाईल आणि ड्रोन हल्ल्यांचा अपयशी प्रयत्न
काल रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानने भारताच्या १५ शहरांवर ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न केला.
अमृतसर, जालंधर, लुधियाना, चंदीगड, पठाणकोट, श्रीनगर, आदमपूर आणि फलोदीसह अनेक शहरं लक्ष्य होती.
मात्र भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीने पाकिस्तानच्या सर्व मिसाईल्स हवेतच नष्ट केल्या.
भारतीय लष्कराचं प्रत्युत्तर: लाहौरमधील हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त
आज सकाळी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या लाहौर शहरामध्ये असलेल्या
हवाई संरक्षण प्रणालींवर अचूक हल्ले करत त्या निष्क्रिय केल्या.
हे प्रतिहल्ले त्याच तीव्रतेने आणि युद्धनैतिकतेनुसार करण्यात आले असल्याची माहिती संरक्षण सूत्रांनी दिली आहे.
‘परमाणु धमक्या’ थांबल्या; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचा पलटलेला सूर
पहलगाम हल्ल्यानंतर सतत भारताला युद्ध आणि परमाणु हल्ल्याच्या धमक्या देणारे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री
ख्वाजा आसिफ यांचा सूर आता पूर्णतः बदललेला दिसतो. एका परदेशी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितले की,
“भारत जर माघार घेत असेल, तर आम्हीही तणाव कमी करण्यासाठी तयार आहोत. आम्ही युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतोय.”
Read Also : https://ajinkyabharat.com/operation-sindoor-nantar-pakistan-bithleli-kurapat/