भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानात घुसून केलेल्या कारवाईनंतर आज भारतीय सेनेकडून
आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून महत्वाची पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर माहिती दिली.
Related News
सांगली जिल्हा परिषदेतील राजकीय भूकंप: शिंदे गट आणि अजित पवार गट महाविकास आघाडीसोबत युती करणार?
सांगली – राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी हलचल पाहायला मिळत आहे.
Continue reading
आशियामध्ये युद्धाचा भडका? चीन–जपान संघर्ष तणावाची स्थिती निर्माण
आशियातील दोन महाशक्तींपैकी चीन आणि जपान यांच्यातील राजनैतिक वाद पुन्हा एकदा उच्च...
Continue reading
दररोज २–३ कप Coffee पिल्याने डिमेन्शियाचा धोका कमी होतो, पण एक अट आहे!
Coffee प्रेमींसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. सकाळची सुरुवात असो किंवा कामाच...
Continue reading
‘The 50 ’: रिद्धी डोगरा सांगते का बरेच लोक रिअॅलिटी शोपासून दूर राहतात; ट्रोलिंग आणि तुलना याबद्दल उघडपणे बोलल्या
टीव्ही, ओटीटी आणि चित्रपट क्षेत्रात आपली कामगिरी सिद्ध केलेली अभि...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : करण-प्राजक्ताचा गुपचूप रोमान्स; घरात फुलत आहे प्रेम
Bigg Boss Marathi 6 ने चाहत्यांच्या मनावर पुन्हा एकदा अधिराज्य ग...
Continue reading
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा सन्मान; पॅरिसमध्ये प्रमाणपत्राची सोहळा
मराठा साम्राज्याचे शौर्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय राज्यका...
Continue reading
SJVN Limited शेअरमध्ये तुफान: गुंतवणूकदारांसाठी डिव्हिडंडसह परतावा
नवरत्न कंपनी एसजेव्हीएन लिमिटेडच्या (SJVN Li...
Continue reading
“२२ एप्रिल रोजी लष्कर-ए-तोयबाशी संबंधित टीआरएफ (द रेझिस्टन्स फ्रंट) या पाकप्रशिक्षित दहशतवादी संघटनेने
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर क्रूर हल्ला केला. या हल्ल्यात २५ भारतीय आणि १ नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला.
मुंबई २६/११ नंतरचा हा सर्वात गंभीर हल्ला होता,” असे त्यांनी सांगितले.
विक्रम मिस्री यांनी स्पष्ट केलं की पहलगाम हल्ल्याची जबाबदारी ‘टीआरएफ’ या गटाने घेतली असून,
या गटाचा थेट संबंध लष्कर-ए-तोयबाशी आहे. “हल्ल्याच्या तपासात दहशतवाद्यांशी पाकिस्तानचे थेट संबंध उघड झाले आहेत,” असेही त्यांनी नमूद केले.
त्यांनी सांगितले की भारताच्या गुप्तचर यंत्रणांना पाकिस्तानमधून पुन्हा भारतावर हल्ला होण्याची माहिती आधीच मिळाली होती.
त्यामुळे अशा हल्ल्यांना वेळेत रोखणे गरजेचे होते. “काश्मीरमधील विकास थांबवण्यासाठी आणि अस्थिरता निर्माण करण्यासाठी हे कट कारस्थान रचले गेले होते,” असेही ते म्हणाले.
‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने केवळ दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले नसून, दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानी यंत्रणांना देखील स्पष्ट संदेश दिला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/23-minutes-pakistancha-maj-utvanya-operation-sindoor-nantar-pakistani-gugalwar-search-what-is-this-vermilion/