पुणे | प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केला
असून यंदाचा एकूण निकाल 91.88 टक्के लागला आहे.
मुलींची उत्तीर्णता 94.58% असून, मुलांचा निकाल 89.51% लागला आहे.
Related News
यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली असून त्यांची सरासरी मुलांपेक्षा 5.07 टक्क्यांनी अधिक आहे.
शाखानिहाय निकाल
विज्ञान – 97.35%
कला – 88.52%
वाणिज्य – 92.68%
व्यवसाय अभ्यासक्रम – 83.03%
आयटीआय – 82.03%
विभागनिहाय निकाल
कोकण – 96.74% (सर्वोच्च)
मुंबई – 92.93%
छ. संभाजीनगर – 92.24%
कोल्हापूर – 93.64%
अमरावती – 91.43%
पुणे – 91.32%
नाशिक – 91.31%
नागपूर – 90.52%
लातूर – 89.46% (सर्वात कमी)
विद्यार्थी संख्येचा आढावा
परीक्षेसाठी एकूण 15,05,037 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
त्यात 8,10,348 मुलं आणि 6,94,652 मुली सहभागी झाल्या.
37 ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनीही परीक्षा दिली.
नियमित विद्यार्थी – 13,02,873 उत्तीर्ण (91.88%)
खाजगी विद्यार्थी – 83.73% उत्तीर्ण
पुनर्परीक्षार्थी – 37.65% उत्तीर्ण
दिव्यांग विद्यार्थी – 92.38% उत्तीर्ण
गैरप्रकार व चौकशी
परीक्षेदरम्यान 124 केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले असून त्यांची सखोल चौकशी होणार आहे.
374 कॉपी प्रकरणं उघडकीस आली आहेत. त्यापैकी सर्वाधिक छत्रपती संभाजीनगर (214 प्रकरणं) आणि पुणे (45) मध्ये नोंद झाली.
निकालाची ऑनलाईन पाहण्याची प्रक्रिया
mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन निकाल पाहता येईल.
विद्यार्थ्यांना रोल नंबर आणि आईचे पहिले नाव आवश्यक असेल.
गुणपत्रिका 6 मेपासून कॉलेजमध्ये उपलब्ध होणार.
पुनर्मूल्यांकनासाठी लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होईल.
पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये, निकाल सप्टेंबरमध्ये अपेक्षित.
निकालातील घसरण
गेल्या वर्षी (2024) निकाल होता 93.37%, तर यंदा तो घसरून 91.88% झाला आहे – म्हणजेच 1.49 टक्क्यांची घट.
Read Also : https://ajinkyabharat.com/pune-mahamargawar-tarunacha-jeevaghena-stunt/
