अकोला –
विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
ने आज अकोल्यात जोरदार ट्रॅक्टर मोर्चा काढला.
Related News
चारधाम यात्रा करणार सोपी
तामिळनाडूतील मच्छिमारांवर श्रीलंकन लुटारूंचा हल्ला
पाकिस्तान ध्वजावाहक जहाजांना भारतात प्रवेशबंदी
सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
प्रेमसंबंधामुळे चिडलेल्या पित्याचे राक्षसी रूप
श्री लैराई देवीच्या यात्रेत भीषण चेंगराचेंगरी
अंतराळात आनंदाचा क्षण!
अकोला: जुना शहर पोळा चौकात युवकावर जीवघेणा हल्ला
अकोला: नवीन उड्डाणपुलावर दुचाकी अपघात
झांसी: डीजे वाजवल्याच्या वादातून गोंधळ
IPL 2025: चेन्नई सुपर किंग्समधून ‘या’ 5 खेळाडूंना दाखवला जाईल बाहेरचा रस्ता?;
“भारत युद्ध करेल” भीतीने थरथरलेला पाकिस्तान!
अकोल्यातील क्रिकेट क्लब मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हजारो शेतकऱ्यांचा लोंढा
धडकला आणि सरकारविरोधात घोषणाबाजी करत रोष व्यक्त करण्यात आला.
ट्रॅक्टर मोर्चा आणि शेतकऱ्यांचा उद्रेक
या ट्रॅक्टर मोर्चात विदर्भातील सहा जिल्ह्यांमधून शेतकरी सहभागी झाले होते.
अकोल्यात झालेल्या आंदोलनात शेतकऱ्यांनी कर्जमाफी, वीजबिल माफ करणे,
हमीभाव लागू करणे, आणि सातबाऱ्यावरून कर्ज हटवणे अशा अनेक मागण्या मांडल्या.
जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
आमदार नितीन देशमुख यांचा सरकारवर हल्लाबोल
मोर्चादरम्यान शिवसेना (ठाकरे गट) आमदार नितीन देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.
“फडणवीस यांनी निवडणुकीआधी कर्जमाफीच्या मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या, पण आजही शेतकऱ्याचा सातबारा कोरा नाही.”
“जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर हिवाळी अधिवेशनात लाखो शेतकऱ्यांना घेऊन विधानभवनावर धडक देऊ,” असा इशाराही त्यांनी दिला.
सरकारवर वाढता दबाव
शिवसेना (ठाकरे गट) च्या या आंदोलनामुळे विदर्भातील शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत.
आत्महत्येचे प्रमाण कमी करण्यासाठी केवळ घोषणांपेक्षा ठोस अंमलबजावणी हवी, असा शेतकऱ्यांचा सूर आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/pahalgam-hallyamage-hamasachan-naw-connection-ughd/