अकोला –
काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
या घटनेचा परिणाम अकोल्याच्या पर्यटकांवरही झाला असून, अकोल्यातील ३१ पर्यटक सध्या श्रीनगरमध्ये अडकलेले आहेत.
Related News
मनभा परिसरात संततधार पावसामुळे दुबार पेरणीचे संकट; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
हिंदी जीआरवर सरकारची माघार; ठाकरेबंधूंच्या एकतेमुळे मराठी ताकद उभी – संजय राऊतांचा दावा
हिंदी सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक; “जाधव येऊ देत की कोणीतरी… आम्ही खपवून घेणार नाही!”
अकोला जिल्ह्यात व्यवसाय शिक्षण अधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत
शिक्षण राज्यमंत्री यांच्या हस्ते श्री शिवाजी विद्यालयाच्या गौरी व वैभवीचा सत्कार
बोर्डी ग्राम पंचायत थकित गौण खनिज दंड वसुली प्रकरण गुलदस्त्यात
कुंडामधून गरम पाण्याचा झरा : अद्भुत घटना
पिंजर पोलिसाकडून अमली पदार्थ मिशन उडान दिनानिमित्त विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन
जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त ‘मिशन उडान’ अंतर्गत अकोला पोलिसांकडून भव्य जनजागृती उपक्रम
राजेश्वर मंदिराच्या विकासावरून आरोप-प्रत्यारोप; भाजपाची आमदार पठाण यांच्यावर टीका
दानापुर येथे राजर्षी शाहु महाराज जयंती उत्सव संपन्न
रशियात खासगी दौऱ्यावर गेलेले शशि थरूर; मॉस्कोमध्ये रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
हे सर्व पर्यटक १८ एप्रिल ते २८ एप्रिल दरम्यान ‘गुरुमाऊली टूर्स’च्या माध्यमातून काश्मीर दौऱ्यावर गेले होते.
मात्र, पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी पुढील प्रवास तात्काळ थांबवला आहे.
स्थानीय नागरिकांनी दिला आधार, पर्यटक सुखरूप
सध्या हे पर्यटक श्रीनगरमध्ये थांबले असून, तेथील स्थानिक नागरिकांनी त्यांना
सहकार्य व मदत केली असल्यामुळे ते सर्वजण सुखरूप आहेत,
अशी माहिती मिळाली आहे. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता, हे पर्यटक मिळेल त्या मार्गाने अकोल्यात परत यायला इच्छुक आहेत.
परतीसाठी राज्य सरकारकडे मदतीची मागणी
पर्यटकांनी लवकरात लवकर अकोल्यात परतण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न व्हावेत, अशी मागणी केली आहे.
त्यासाठी यंत्रणांनी तात्काळ हालचाली करून सुरक्षित परतीची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा पर्यटकांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/chorla-stuck-stolen/