पारंपरिक शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
कधी निसर्ग साथ देत नाही, कधी बाजारभाव कोसळतो – परिणामी उत्पन्नात घट होते.
पण अकोल्याच्या दिग्रस गावातील एका महिला शेतकऱ्याने हे चित्र पूर्णपणे बदलून टाकलं आहे.
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
उर्मिला शेलगावकर यांनी पारंपरिक पिकांना बाजूला ठेवत कलिंगडाच्या शेतीत यशाचं पाणी पाजलं आहे.
केवळ एका एकरातून त्यांनी अडीच लाखांचं उत्पन्न घेतलंय. पाहूया त्यांची ही यशोगाथा..
पातूर तालुक्यातील दिग्रस येथील महिला शेतकरी उर्मिला जगन्नाथ शेलगावकर यांचं कार्य
आज पश्चिम विदर्भातील अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
त्यांनी एका एकरात कलिंगडाची लागवड करून, योग्य नियोजन,
मशागत आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनानं अवघ्या 75 दिवसांत अडीच लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलं आहे.
आणि अजूनही 25 ते 30 हजारांचे उत्पन्न होण्याची शक्यता आहे.
प्रत्येक कलिंगड सरासरी 6 ते 7 किलो वजनाचं असल्याने, त्यांच्या मालाला बाजारात मोठी मागणी आहे.
यशामागे नियमित पीकनिरीक्षण, आंतर मशागत आणि बाजारपेठेचा अभ्यास यांचा मोठा वाटा आहे.
याच आत्मविश्वासातून त्यांनी आता आणखी दोन एकरांत कलिंगडाची लागवड सुरू केली आहे.
विशेष म्हणजे उर्मिला या एम.ए., बी.एड. शिक्षण घेतलेली असूनही नोकरीचा माग नाही धरला,
शेती व्यवसायात पाऊल टाकून त्यांनी स्वतःचं एक स्वतंत्र स्थान निर्माण
उर्मिला यांच्या या प्रवासात त्यांचे पती, जगन्नाथ शेलगावकर, हे कायम त्यांच्या सोबत उभे राहिले.
शेतीतील प्रत्येक निर्णयात उर्मिलांची भूमिका निर्णायक असली,
तरी या वाटचालीत पती-पत्नीने एकत्र शेती करणं ही त्यांची यशाची गुरुकिल्ली ठरली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/sanandancha-dhikhi-karyancha-nationalist-ajit-pawar-middle-admission/