अकोला |
14 एप्रिल: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अकोल्यातील जुन्या बसस्थानकावर साकारण्यात
आलेल्या भव्य रांगोळीवरून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मध्यरात्री
Related News
कुरणखेड जवळ अपघात एक युवक जागेवर ठार.
श्रीच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान – सलग 56वे वर्ष, 700 हून अधिक वारकरी सहभागी
बाळापूरमधील तीन रहिवाशांचा मृत्यू.
ज्वारी काढणीच्या कामात नागाचा साक्षात्कार
कुणाल किशोर कमलाकर प्रकरणात काका वर खुनाचा गुन्हा दाखल.
बोरगाव मंजू येथे गोवंशाला जीवनदान.
उन्हाळी क्रिकेट शिबिराचा समारोप.
अकोट शहरात एकास ट्रकने चिरडले, घटनास्थळावरच दुर्दैवी मृत्यू
बांगलादेश यांची भारतातून रवानगी…
डीडीए रिक्वायरमेंट 2005 दिल्ली विकास प्राधिकरण मध्ये सरकारी नोकरी…
अकोल्यात ऑफ्रोह संघटनेचे धरणे आंदोलन;
बोर्डी येथील घोगा नाल्यावरील संरक्षण भिंतीचे काम अर्धवट
शाब्दिक वाद निर्माण झाला. सुमारे 18 हजार चौरस फूट जागेत रांगोळीतून
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा साकारण्यात आली होती,
मात्र या प्रतिमेजवळ काँग्रेसचे ‘पंजा’ चिन्ह देखील रेखाटल्याचे दिसून आले.
यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
रात्री उशिरा वंचितचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले आणि हातात झाडू घेऊन ‘पंजा’ चिन्ह पुसून टाकलं.
यानंतर काँग्रेस आणि वंचित कार्यकर्त्यांमध्ये तब्बल चार तास वाद झाला.
या संपूर्ण प्रकारावर प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे म्हणाले,
“बाबासाहेबांना काँग्रेसने दोन वेळा पराभवाचा सामना करायला लावला.
त्यामुळे बाबासाहेबांच्या नावाचा आणि प्रतिमेचा राजकीय उपयोग होऊ देणार नाही.”
सध्या सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून, घटनेने राजकीय वातावरण चांगलंच तापवलं आहे.
प्रशासनाकडून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/maharashthal-mahayati-sarkarmadhyaye-punha-vad-shinde-ani-ajitdada-program/