आलेगाव प्रतिनिधी –
जैन साध्वी कोटा संघ प्रवर्तनी परमपूज्य प्रभा कवरजी म.सा. आणि प्रकाश कवरजी म.सा.
यांच्या आध्यात्मिक विचार प्रेरणेतून साकारलेली जैन साध्वी प्रभा प्रकाश कॉन्व्हेंट, आलेगाव,
Related News
वाढदिवसाच्या केकवर गुन्ह्यांची कलमे! भांडुपच्या गुंडाची ‘गुन्हेगारी थाटात’ पार्टी,
बोर्डी नदीपात्र कोरडेठाक; सहा गावांतील नागरिकांची पातुर तलावातून पाणी सोडण्याची मागणी
पेट्रोल पंपवर घटतौलीची तक्रार महागात पडली; ग्राहकाला लाठ्यांनी मारहाण, 3 सेल्समन अटकेत
उमरा येथे बांधकाम कामगारांसाठी ८ दिवसांचे प्रशिक्षण शिबिर सुरू
थार गाडीच्या टपावर डान्स करणाऱ्या युवकाचा व्हिडिओ व्हायरल
हैदराबादमधील पंचतारांकित हॉटेलला भीषण आग; SRH संघाची तातडीने सुरक्षित हलवणूक
27 मजली अँटिलियाच्या टॉप फ्लोअरवरच का राहतो अंबानी परिवार? वाचा या आलिशान राजवाड्याच्या काही अनोख्या गोष्टी
विचारांचे दीप पेटवणारा कार्यक्रम : शेकापूर फाट्यावर बाबासाहेबांची जयंती उत्साहात साजरी
भटोरी येथे ट्रॅक्टरखाली दबून वयोवृद्ध शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
पातूर तालुक्यात ६० वर्षीय वृद्धाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; पोलीस तपासात गुंतले
अकोल्यात पाल्म संडे भक्तिभावाने साजरा; ख्रिश्चन कॉलनीतून रॅली, प्रार्थना सभांचे आयोजन
2 हजार किलो रांगोळी, बाबासाहेबांचे विचार आणि अकोल्याची अभिमानास्पद कलाकृती
ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा अंतर्गत कार्यरत शाळा असून, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात
विभागस्तरावर व जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आलेली शाळा आहे.
शाळेमध्ये विश्व नवकार मंत्र दिनाचे औचित्य साधून भव्य मंत्रपठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान महावीरांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सामूहिकपणे नवकार मंत्राचे पठण केले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एडव्होकेट विक्रमजी जाधव सर, अनिलजी जाधव सर, तर अध्यक्ष म्हणून
अक्षय जैन सर उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक महावीर सर यांनी नवकार मंत्राचे मानवी जीवनाशी असलेले नाते विशद करताना,
“हा मंत्र आपल्या आदर्शांप्रतीचा विनम्र भाव दर्शवतो,” असे सांगितले.
विक्रमजी जाधव सर यांनी आपल्या भाषणात “भारतीय संस्कृतीवर चैनीझमचे फुल फुलले असून,
जैन विचारांचा सुवास संपूर्ण विश्वाला मोहून टाकतो,” असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात अक्षय जैन सर यांनी
“चांगल्या विचारांना कोणताही धर्म किंवा जात बंधन करत नाही,” असे स्पष्ट केले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रपठण कार्यक्रमातील थेट प्रक्षेपणाचा अनुभव घेतला.
कार्यक्रमाचा समारोप खाऊ वाटप करून करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम आनंद आणि भक्तिभावाने पार पडला.