कार्यालयीन वेळेत अधिकारी-कर्मचारी गायब; नागरिक त्रस्त**
अकोला | प्रतिनिधी : श्रीकांत पाचकवडे
अकोला जिल्हा परिषदेतील कारभार पुन्हा एकदा रामभरोसे असल्याचे चित्र समोर आले आहे.
Related News
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
बीअरच्या बाटलीने ३६ वार:
चित्तौडगडमध्ये ‘द बर्निंग कार’! कलेक्ट्रेटजवळ उभी असलेली कार पेटली
“अंबाजोगाईत वकिल महिला बळी ठरली एका कटाचा?
ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाचे मुख्य केंद्र असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यालयीन वेळेत
अनेक विभागांतील अधिकारी व कर्मचारी हे आपल्या कक्षात गैरहजर असल्याचे सोमवारी (ता. ७) पाहायला मिळाले.
या मनमानी कारभारामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना ताटकळत बसावे लागत आहे.
ग्रामविकासाच्या योजनांवर परिणाम
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण विकासाच्या विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते.
मात्र, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामचलाऊ व निष्काळजी भूमिकेमुळे
अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी अडथळ्यांमध्ये सापडली आहे.
सीईओ बदलीनंतर पुन्हा शिथिलता
माजी सीईओ बी. वैष्णवी यांनी अचानक भेट देऊन अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला होता.
मात्र त्यांची अलीकडेच नागपूर महापालिकेत बदली झाल्यापासून, अनेक ‘दांडीबहाद्दर’ कर्मचाऱ्यांना मोकळे रान मिळाले आहे.
‘टपरी’चे कर्मचारी!
काही कर्मचारी बायोमेट्रिक हजेरीनंतर कार्यालयात थांबतच नाहीत,
तर जिल्हा परिषद आवारात भटकंती करताना, चहा टपरी, पानपट्टीवर थांबलेले दिसतात.
त्यामुळे नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागते.
साहेब गेलेत, थोड्याच वेळात येतील…
गैरहजर कर्मचाऱ्यांविषयी विचारल्यावर “साहेब आत्ताच बाहेर गेलेत”, “जिल्हाधिकारी कार्यालयात काम आहे”,
अशा बनवाबनवी कारणांची सरबत्ती केली जाते. त्यांचे सहकारीदेखील बेशिस्त वागणुकीवर पांघरूण घालतात.
विजेचा देखील अपव्यय
कार्यालय रिकामे असताना लाईट्स व पंखे सुरू ठेवून विजेचा अपव्यय होत असल्याचेही पाहायला मिळाले.
याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करणे गरजेचे झाले आहे.
नागरिकांमध्ये संताप
सरकारी कार्यालयात वेळेवर काम न झाल्याने सामान्य जनतेला मानसिक त्रास सहन करावा लागत असून,
अशा बेजबाबदार कारभारामुळे जिल्हा परिषद प्रशासनावरचा विश्वास डळमळीत होत असल्याची प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.