अकोला – अकोल्यात मानवी संवेदनशीलतेला काळिमा फासणारा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
मुक्या प्राण्यांना विषारी अन्न देऊन ठार मारल्याची घटना गुडधी परिसरात घडली असून,
या क्रूर कृत्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Related News
“राज्यातील सरकार ही लुटारू रचना” – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
भारतमाला एक्सप्रेस हायवेवर ज्वलनशील केमिकलने भरलेला टँकर उलटला;
सीकर कृषी मंडीत भीषण आग;
हनुमान जयंतीनिमित्त भव्य धार्मिक आयोजन – भक्तांनी घेतला आनंद
पातूर येथे उत्साहात गुरु-शिष्य जयंती साजरी
दिल्ली विमानतळावर तात्पुरता बदल: T2 टर्मिनल बंद,
श्रीनगर – अमरनाथ यात्रा 2025 साठी नोंदणी प्रक्रियेची सुरुवात झाली आहे…
अंबेडकर जयंती शोभायात्रा दरम्यान युवतीसोबत छेडछाड;
आर्थिक सुबत्ता असेल तरच इतरांशी स्पर्धा करू शकतो : डॉ सुगत वाघमारे
“ब्लू ओरिजिन”ने रचला इतिहास; केटी पेरीसह ६ महिलांचा यशस्वी अंतराळ प्रवास
वाराणसी सामूहिक बलात्कार प्रकरण : डीसीपी चंद्रकांत मीणा हटवले; पंतप्रधान मोदी नाराज
खामगाव-नांदुरा रोडवर भीषण अपघात: बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; ३ ठार, २० जण गंभीर जखमी
प्राप्त माहितीनुसार, रस्त्यावर भटकणारे मोकाट कुत्रे तसेच काही पाळीव कुत्रे अंगावर भुंकतात,
या कारणावरून एका अज्ञात व्यक्तीने थेट विषारी औषध टाकलेले अन्न
देऊन जवळपास २५ पेक्षा अधिक कुत्र्यांना विषबाधा झाली.
विशेष म्हणजे, २४ तासांच्या आत या प्राण्यांनी प्राण सोडले, आणि काही अजूनही गंभीर अवस्थेत आहेत.
हा प्रकार गुडधी भागात काल रात्री उघडकीस आला. परिसरात सतत कुत्र्यांच्या मृतदेह आढळून येत
असल्याने स्थानिकांमध्ये भीती आणि चिंता निर्माण झाली.
स्थानिक नागरिकांनी जागरूकतेने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली,
त्यामध्ये एक व्यक्ती कुत्र्यांना खाण्यास काहीतरी देताना दिसतो.
त्यानंतर लगेच त्या प्राण्यांची प्रकृती बिघडल्याचेही कैद झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित आरोपीचा शोध सुरू केला आहे.
प्राणिप्रेमींमध्ये संतापाचा उद्रेक
या घटनेमुळे प्राणीप्रेमी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
ते म्हणतात, “मुक्या जीवांचा असा अमानवीय संहार हा संपूर्ण समाजाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.
अशा क्रूर व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे.”