निंबा अंदुरा (ता. अकोला): दिनांक 2 एप्रिलच्या मध्यरात्री 11 वाजता काझी खेळ,
जानोरी मेळ, वझेगाव, मोखा, हिंगणा परिसरात वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली.
या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, कांदा,
Related News
सालासर बालाजी मंदिरात भव्य हनुमान जन्मोत्सव; प्रयागराज कुंभमेळ्याचा देखावा विशेष आकर्षण
तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न; स्थानिक स्वराज्य निवडणुकांची जोरदार तयारी सुरू
आठवड्यातून तीन दिवस अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था अकोटच्या अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड
शतकानुशिक परंपरेची साक्ष — आसरा माता यात्रा भक्तिभावात पार
ज्ञानेश्वर वरघट पेडगाव वार्ताहर कळंबा बोडखे येथील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
शेतकरी आत्महत्या ग्रस्त निराधार बालकांना शिक्षणासाठी मदतीचा हात; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आर्थिक मदत वाटप
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; अकोट तालुका आढावा बैठक उत्साहात पार
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी
गौण खनिज प्रकरणात पेंडींग असलेल्या दंडाची वसुली रखडली; तहसीलदारांवर टिका
परप्रांतीय कंपन्यांची मुजोरी मोडत स्थानिकांना मिळवून दिला रोजगार….
गहू आणि ज्वारी पिके जमीनदोस्त झाली आहेत.
अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी पेरणी केलेली असल्याने त्यांचे नुकसान अधिकच गंभीर झाले आहे.
शेतकऱ्यांनी या नुकसानीबाबत शासनाने त्वरित सर्वेक्षण करून नुकसानभरपाई द्यावी,
अशी मागणी केली आहे. काझी खेळ येथील शेतकरी अनिल शिवराम धुमाळे यांच्या शेतातील
कांदा वादळी पावसामुळे पूर्णपणे भिजून खराब झाला आहे.
तसेच जानोरी मेळ येथील रमेश परघर मोर, धर्मानंद परघर मोर, दामोदर मस्के, गोपाल खोटरे,
अनंता खोटरे, सचिन काळे, सुधाकर काळे, धनराज खोटरे, गजानन काळे, शांताराम काळे
आदी शेतकऱ्यांचे कांदा आणि ज्वारी पीक पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहे.
शेतकऱ्यांनी शासनावर नाराजी व्यक्त करत, नुकसानीचा त्वरित पंचनामा करण्याची मागणी केली आहे.
प्रशासनाने वेळेत मदत न केल्यास शेतकऱ्यांची परिस्थिती अधिक बिकट होईल
आणि त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहील,
अशी भीती व्यक्त केली जात आहे.