अमरावती: आज (29 मार्च) दुपारी अडीचच्या सुमारास अशोक वाटिका चौक
परिसरातील उड्डाणपुलावर कालीपिली महिंद्रा मॅक्स वाहनाने (MH 30 P 5686)
समोरून येणाऱ्या किया चारचाकी (MH 27 DE 4651) गाडीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली.
Related News
Vikram-1 Launch यशस्वी; भारताच्या खासगी स्पेस सेक्टरने रचला नवा इतिहास
रिकाम्या पोटी दालचिनीचं पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत
सकाळी कोमट पाण्यात मध पिल्याने खरंच वजन कमी होतं? विज्ञानाने सांगितलं सत्य
‘धर्मेंद्र प्रधान यांना असं काय सोनं लागलं?’; सोनम वांगचूक प्रकरणावर उद्धव ठाकरेंचा केंद्रावर हल्लाबोल
सोनम वांगचूक रुग्णालयात; ‘माझ्या परवानगीशिवाय औषध देऊ नका’, पत्नी गीतांजलींचा अल्टिमेटम
भोंदू बाबा अशोक खरात अडचणीत! ईडीचं 3 हजार पानी आरोपपत्र; 42.88 कोटींच्या गैरव्यवहाराचा दावा
मोठी बातमी! पी. व्ही. सिंधूने रचला इतिहास; जपान ओपन 2026 च्या अंतिम फेरीत प्रवेश
मोठी बातमी! अमेरिकेचे MQ-9 ड्रोन पाडल्याचा इराणचा दावा; आखातात तणाव शिगेला
या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अपघात कसा घडला?
टॉवरच्या दिशेने निघालेल्या कालीपिली वाहनाचा चालक गाडीवरील नियंत्रण गमावून
उड्डाणपुलावरील डिव्हायडरला धडकला आणि समोरून येणाऱ्या किया कारवर जाऊन आदळला.
अपघाताची माहिती मिळताच खदान पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी पंचनामा करून दोन्ही चालकांना वाहनांसह पुढील तपासासाठी नेले आहे.
उड्डाणपुलावरील वाढते अपघात – नागरिकांमध्ये संताप
सदर उड्डाणपूल शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी बांधण्यात आला असला तरी,
पुलाच्या उद्घाटनापासून अनेक अपघात घडले आहेत. काही वाहतूक चालक नो
एन्ट्री झोनमधून सर्रास वाहतूक करत असल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण होते.
वाहतूक पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
सेल्फी आणि रीलमुळे वाहतुकीला अडथळा
या उड्डाणपुलावर अनेक नागरिक सेल्फी काढणे आणि सोशल मीडियासाठी रील बनवणे
याकडे आकर्षित होत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
यामुळेच या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
नागरिकांची मागणी – कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त ठेवावा
या पुलावर आतापर्यंत अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे आणखी किती बळी
गेल्यावर प्रशासन उपाययोजना करणार? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या पुलावर कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त ठेवावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

