पत्नीचं मंगळसूत्र वाचविण्यासाठी गेलेल्या पतीचा अत्यंत निघृणपणे खून करण्यात आला.
Akola Crime : बायकोच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरट्याचा पाठलाग करणाऱ्या नवऱ्याचा हकनाक बळी गेला.
पाठलाग करणाऱ्या नवऱ्याला मंगळसूत्र चोरट्यानं बेदम मारहाण केली. आधी डोक्याला जबर मारलं.
नंतर चेहऱ्यावर वार करून गंभीर जखमा केल्या. त्याचा चेहरा दगडाने ठेचला. जीव जाईपर्यंत चोरट्यानं महिलेच्या नवऱ्याला मारहाण केली.
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
हा संपूर्ण प्रकार अकोल्याच्या रेल्वे स्थानक परिसरात घडला आहे.
अकोल्याच्या रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म चारवर रेल्वेतून एक दाम्पत्य खाली उतरत असताना एका चोरट्याने पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला.
(‘NDTV मराठी’ चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महिलेच्या नवऱ्यानं मंगळसूत्र चोरट्यांचा पाठलाग केला. जवळपास आठशे ते नऊशे मीटरपर्यंत पाठलाग सुरुच होता.
अखेर त्याच्या तावडीत मंगळसूत्र चोरटा आला खरा. मात्र, या चोरट्याने हातात येईल त्या वस्तूने त्याच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार करत गंभीर दुखापत केली.
हेमंत गावंडे असं या पाठलाग करणाऱ्या नवऱ्याचं नाव. उपचारादरम्यान हेमंत गावंडे यांचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी या प्रकरणात गुन्ह्याची वाढ केली असून तपास सुरू केला आहे. या संपूर्ण घटनेचा थरार हेमंतच्या बायकोने सांगितला आहे.
मंगळसूत्र न्यायचं होतं, पण नवऱ्याला कशाला मारलं? असा सवाल तिने केला आहे.