सातारा जिल्ह्यातील जावळी, महाबळेश्वर, पाटण आणि वाई तालुक्यांमध्ये खैर वृक्षांची अवैध तोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
पुष्पा चित्रपटामुळे कशा पद्धतीने चंदनाची तस्करी होते हे तुम्ही पाहिलं असेल.
त्याच पद्धतीने सह्याद्रीच्या पश्चिम घाटात आढळणाऱ्या खैर या झाडांचा लाकडांची देखील तस्करी मोठ्या प्रमाणात होते.
Related News
पावसाने सध्या विश्रांती घेतली असली तरीही तो आता त्याचा जोर पुन्हा दाखवणार हवामान खात्याने दिला .
या जिल्ह्यांना अलर्ट गेल्या काही दिवसांपासून मान्सून च्या आगमनानंतर पावसाने राज्...
Continue reading
दि. ६ जून २०२५
पातूर : अकोला - वाशिम महामार्गावर पातूर पासून वाशिमकडे सुमारे १० किलोमीटर अंतरावर असलेल्या
माळराजुरा फाट्यानजीक मध्यरात्रीच्या सुमारास बर्निंग ट्रकचा थरार पहावया...
Continue reading
तुमच्या परेश प्रमाणे तुमचे आणि आमच्या पालकांचे भविष्य सुरक्षित होते डॉक्टर वाघमारे
अकोला दिनांक 5 विद्यार्थ्यांना आपले ध्येय निश्चित करून आता पाच वर्ष कठीण
परेशान करा म्हणजे ...
Continue reading
अकोला जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्ह्यातील विकासकामांच्या आढाव्यासाठी आयोजित करण्यात आली होती.
मात्र, ही बैठक विकासाच्या चर्चा करण्याऐवजी राजकीय कलगीतुराच्या वादात रंगली. पालक...
Continue reading
पातुर तालुका प्रतिनिधी चानी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पिंपळ डोळी फाट्या नजीक वन
विभागाच्या विश्रामगृहासमोर अवैध गौण खनिज विना रायल्टी वाहतूक करून निदर्शनास आल्यानंतर
...
Continue reading
अकोल्यातील बार्शीटाकळी शहरात आज एक भीषण अपघात घडला आहे.
या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून,
अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
घटना बार्शीटाकळीतील नवीन ...
Continue reading
पुणे |
हिंजवडीतील 'द क्राऊन ग्रीन' सोसायटीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
25 वर्षीय आयटी अभियंता अभिलाषा कोथंबिरे हिने 21व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्य...
Continue reading
पातूर : संत गजानन महाराजांची पालखी ७ जून रोजी पातूरला पोहचणार असून स्वागतासाठी
जय्यत तयारी करण्यात आली आहे.श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने श्रींच्या पालखीचे श्रीक्षेत्र
पं...
Continue reading
नवी दिल्ली: भारत आणि फ्रान्समध्ये राफेल विमान निर्मितीसंदर्भात ऐतिहासिक करार झाला असून,
यानुसार राफेल जेटचा संपूर्ण ढाचा आता भारतातच तयार होणार आहे.
टाटा अॅडव्...
Continue reading
जालना मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे ती म्हणजे अशी की रुग्णांवरती
चक्क फरशीवर गादी टाकून सलाईन द्वारे उपचार करण्यात येत आहे.
जालना जिल्ह्यामधील सामान्य रुग्णालयातील एक...
Continue reading
नवी दिल्ली |
पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7, लोक कल्याण मार्ग, दिल्ली येथील
आपल्या निवासस्थानी ‘सिंदूर’ वनस्पतीचे (Bixa orellana) रोपण केले.
हे रोप त्यांना ...
Continue reading
शेगावच्या संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांची पालखीने छोट्या छोट्या व्यावसायिकांना
व्यापाराचा आधार दिल्याचं पाहायला मिळालंय. पंढरपूरकडे निघालेल्या पालखी
सोबत हे किरकोळ विक्रे...
Continue reading
याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
सातारा जिल्ह्यातील जावळी, महाबळेश्वर, पाटण आणि वाई तालुक्यांमध्ये खैर वृक्षांची अवैध तोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
खैर हे संरक्षित यादीतील वृक्ष असून देखील त्याची मोठ्या प्रमाणात तोड होते आहे.
एकीकडे वन विभागाने खैर संवर्धनासाठी विविध नियम लागू केले असतानाही, कोकणातील काही व्यापारी या वृक्षांची
अवैध तोड करून लाकूड कर्नाटक आणि गोवा येथील कारखान्यांना पुरवतात, जिथे ते गुटखा, मावा, पान,
सुपारी कात इत्यादी वस्तूंच्या उत्पादनात वापरले जाते. साताऱ्यातील जावळी तालुक्यात ही वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे.
जावळी वनपरिक्षेत्राधिकार्यांनी यापूर्वी १६ कारवाया केल्या आहेत, तरीदेखील ही वृक्षतोड सुरूच आहे.
ही वृक्षतोड रोखण्यासाठी सातारातील उपवनसंरक्षकांनी मेढा, महाबळेश्वर आणि पाटण तालुक्यांच्या सीमेवर गस्त पथक वाढवण्याची मोहीम हाती घेतली आहे.
त्याच बरोबर चुकीच्या पद्धतीने जर खैर ची तोड होत असेल तर त्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज यांनी दिला आहे.
खैर वृक्ष का महत्वाचा?
खैर वृक्षाचे वैज्ञानिक नाव Senegalia catechu असे आहे. खैर वृक्ष प्रामुख्याने सह्याद्रीच्या डोंगर उताराला असणाऱ्या जमिनीवर आढळतात.
खैराचे लाकूड कठीण, टिकाऊ आणि वाळवीरोधक असते. त्यामुळे त्याचा वापर घरबांधणी, शेतीची अवजारे आणि इतर बांधकामांमध्ये होतो.
खैराच्या लाकडापासून कात (कत्था) तयार केला जातो, त्याच बरोबर गुटखा, पान मसाला बनविण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो.
फक्त 250 ते 300 रूपयात व्यापारी शेतकऱ्याचा शेतजमिनीतील ही झाडे विकत घेतात
अल्प दरात कोकणातील व्यापारी सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा गायरान जमिनीत असणारी ही झाडे तोडून त्याचे रॅकेट चालवत आहेत.
पण अवैध वृक्षतोडीमुळे पर्यावरणीय संतुलन बिघडते आणि जैवविविधतेवर नकारात्मक परिणाम होतो.
त्यामुळे, वन विभागाने कठोर पावले उचलून आणि स्थानिक जनतेच्या सहकार्याने या वृक्षतोडीला आळा घालणे आवश्यक आहे.