Devendra Fadnavis : धनंजय मुंडे यांचा काल मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला.
त्याचं दिवशी मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या सर्व मंत्र्यांना खडे बोल सुनावले आहेत.
सध्या महाराष्ट्र विधानसभेच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे.
Related News
रियान परागचा व्हायरल व्हिडीओ चर्चेत; लहान चाहत्याला फोटो नाकारल्याने सोशल मीडियावर संताप
इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL 2026 सध्या अतिशय रोमांचक टप...
Continue reading
Cannes Film Festival 2026 अजूनही हाय हिल्सच्या मोहातून बाहेर पडू शकत नाही? स्नीकर्स घालून क्रिस्टन स्टीवर्टने पुन्हा पेटवली चर्चा
जगातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांपैकी एक...
Continue reading
उन्हाळ्यात दररोज दही-भात खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात? दोन आठवड्यांत दिसू शकतात हे फायदे
उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला थंडावा देणारे आणि पोटाला आराम देणारे पदार्थ खाण्याकडे लोका...
Continue reading
Rose Gulkand Ice Cream : उन्हाळ्यात थंडावा देणारा सुगंधी आणि क्रीमी डेझर्ट
Rose Gulkand Ice Cream : उन्हाळ्याच्या दिवसांत थंड, गोड आण...
Continue reading
काल धनंजय मुंडे यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मागच्या अडीच महिन्यापासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुरु होती.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला.
कारण या हत्या प्रकरणाचा मुख्य मास्टरमाइंड वाल्मिक कराड असल्याच समोर आलं.
तो धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातो. वाल्मिक कराडमुळेच आधी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती.
तोच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामागचा मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप झाला होता.
पण मागच्या आठवड्यात सीआयडीने 1800 पानी आरोपपत्र दाखल झालं. त्यातून ही बाब समोर आली.
त्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या वेळचे फोटो समोर आले.
त्यातून अत्यंत अमानुषता दिसून आली. या सगळ्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांचा काल मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला.
धनंजय मुंडे यांनी त्यांच्या राजीनाम्साठी प्रकृतीच कारण दिलय. दरम्यान या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या मंत्र्यांना दम भरला आहे. “चुकीचं वर्तन आणि काम केलं तर परिणाम भोगावे लागतील”
अशा इशाराच मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना दिला आहे.
भाजपाच्या सर्व मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांनी सागर निवासस्थानी बैठक घेतली.
बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना दम भरला. त्याचवेळी मंत्र्यांना सार्वजनिक वर्तनाचे बोल ही सुनावले.
‘भाजपाच्या आमदारांना सन्मानाने वागवा’
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याच्या दिवशीच बैठक झाली. त्याचं दिवशी या सर्व मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी खडे बोल सुनावले.
“तुम्ही जनतेचे मंत्री आहात आणि भाजपाच्या आमदारांना सन्मानाने वागवा. लोकहिताची काम आणि चांगल्या योजना शासनासाठी सुचवा”
अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना केल्या आहेत. “
लोकांशी बोलताना भाषा आणि वर्तणूक चांगली ठेवा. मोबाईलवर बोलताना तारतम्य ठेवा.
चुकीचे वर्तन मंत्रीपदावर गंभीर परिणाम करेल” असा मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या मंत्र्यांना थेट इशारा दिला आहे.