चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडियाने धडक मारली आहे.
भारताचा अंतिम फेरीत सामना दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील विजयी संघाशी होणार आहे.
दुसरीकडे, हा सामना कर्णधार रोहित शर्माच्या कारकिर्दीचा शेवट असेल, अशी चर्चा क्रीडावर्तुळात रंगली आहे.
यावर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने आपलं मत मांडलं आहे.
टीम इंडियाने उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ गडी राखून पराभव केला.
Related News
बाळासाहेबांनंतर शिवसेनेत मनमानी सुरू झाली होती; एकनाथ शिंदेंचा खळबळजनक गौप्यस्फोट
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी; शिंदे गटाकडून जोरदार युक्ति...
Continue reading
आता १० आणि २० रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल; RBI चा प्लास्टिक नोटांबाबत महत्त्वाचा निर्णय, चीन-पाकिस्तान कनेक्शनवरही अट
भारत...
Continue reading
महागाईचा दणका! मुंबईकरांना मोठा झटका; CNG आणि PNGच्या दरात वाढ, पेट्रोल-डिझेलही महागण्याची शक्यता
महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. मुंबई...
Continue reading
Rinku Singh : बेस्ट फिनिशर रिंकू सिंहचं करिअरचं फिनिश का? अफगाणिस्तानविरुद्धच्या T20 मालिकेतून वगळण्याचं कारण आलं समोर
T20 : भारतीय क्रिकेट संघातील आक्रमक...
Continue reading
Bigg Boss 20: ‘बिग बॉस’च्या घरात होणार घमासान! स्पर्धकांची संभाव्य यादी चर्चेत; मेरी कोमपासून करण वाहीपर्यंत अनेक नावं
Bigg Boss 20 : छोट्या पडद्...
Continue reading
‘Hanuman Ansh सिनेमाला प्रेमानंद महाराजांची मोठी वॉर्निंग; निर्मात्यांना नेमकी कसली होती भीती? २ कोटींच्या बजेटमध्ये ५० कोटींची कमाई
अध्यात्म, भक्ती आणि महान संतांच्या जीवनावर आधा...
Continue reading
नवी कार खरेदी करायची? ऑगस्टमध्ये ‘या’ कंपन्यांच्या गाड्यांची जोरदार विक्री; ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी
नवी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ऑगस्ट २०२६ मधील भारतीय ऑटोमोबाइ...
Continue reading
Iran-US War Update : लग्न सोहळा सुरू असलेल्या घरावर अमेरिकेचा मिसाइल हल्ला; लहान मुलासह 5 जणांचा मृत्यू, 50 हून अधिक जखमी
Iran-US War Update
Continue reading
Sugar Stock Limit: देशभरात साखरेच्या साठेबाजीवर निर्बंध; कोलकात्याला मात्र विशेष सूट, सरकारने का घेतला हा निर्णय?
सणासुदीच्या काळात साखरेची साठेबाजी, कृ...
Continue reading
Manoj Jarange Patil साठी चार तरुणांचे आमरण उपोषण; ठिकठिकाणी रास्ता रोको, उद्या परभणी बंदची हाक
Manoj Jarange Patil यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस; प्रकृती खालावल्याने मराठा आंदोलक ...
Continue reading
Gold Silver Rate Today : पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी थेट 5 हजारांनी स्वस्त
Gold Silver Rate Today
Continue reading
Sonu Sood पूरग्रस्तांच्या मदतीसाठी थेट काठमांडूत; म्हणाला, ‘उद्ध्वस्त झालेली आयुष्य पुन्हा उभी करणार’
नेपाळमध्ये आलेल्या भीषण पूर आणि भूस्खलनामुळे हजारो नागरिकांचे जीवन विस्कळीत...
Continue reading
दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात खरं तर २६५ धावांचं खडतर आव्हान होतं.
पण हे आव्हान भारताने सहज गाठलं. आता भारत अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील विजयी संघाशी लढा करणार आहे.
हा सामना ९ मार्चला होणार आहे. पण ९ मार्च रोहित शर्माच्या वनडे कारकिर्दीचा शेवटचा सामना असेल का?
अशी चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे. रोहित शर्माचं वय आणि पुढील रणनिती पाहता बीसीसीआय काय निर्णय घेते याकडे लक्ष लागून आहे.
कारण भारतीय संघ २०२७ मध्ये वनडे वर्ल्डकप खेळणार आहे. तिथपर्यंत रोहित शर्माची वनडे जागा राहील की नाही?
याबाबतही शंका आहे. या सर्व प्रश्नांबाबत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याला प्रश्न विचारण्यात आला.
दुबईत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत गौतम गंभीरला विचारलं गेलं की, चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित शर्माचा प्लान काय आहे? त्याच्यात अजून किती क्रिकेट बाकी आहे?
प्रश्नांचा भडिमार सुरु झाल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने सांगितलं की, ‘आता तर चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना समोर आहे.
आता मी याबाबत काय बोलू?
पण एक गोष्ट सांगू इच्छितो की, जर कर्णधार याच पद्धतीने फलंदाजी करत असेल
तर तो ड्रेसिंग रुमसाठी मेसेज आहे. त्याच्यात अजून क्रिकेट बाकी आहे. रोहितने मोठी खेळी केली नाही पण चांगली खेळी केली आहे.
आम्ही त्याच प्रभावाने खेळाडूंचं मूल्यमापन करतो.’
गौतम गंभीरने पुढे सांगितलं की, तज्ज्ञ आणि पत्रकार धावा आणि सरासरी बघतात.
पण आम्ही त्या खेळाडूने सामन्यात कशी छाप सोडली हे पाहतो. जर सर्व काही व्यवस्थित आहे तर त्याने काही फरक पडत नाही.
आपण ज्या प्रकारचे क्रिकेट खेळू इच्छितो त्यासाठी जर कर्णधार पहिला हात वर करत असेल तर त्यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही.
दुसरीकडे, बीसीसीआय चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर वनडे फॉर्मेटसाठी वेगळा विचार करत आहे. २०२७ वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या तयारीसाठी नव्या कर्णधाराच्या शोधात आहे.
त्यामुळे चॅम्पियन्स
ट्रॉफी ही रोहित शर्माच्या वनडे कारकिर्दीचा शेवटचा सामना असू शकतो.
आता रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदानंतर निवृत्ती घेतो की पुढे खेळतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
या स्पर्धेनंतर टीम इंडिया थेट इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. ही कसोटी मालिका जूनमध्ये होणार आहे.
या मालिकेपूर्वी संघात काय उलथापालथ होते याकडे लक्ष लागून आहे.