धनंजय मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळांची सरकारमध्ये एन्ट्री होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
मात्र याच मुद्यावरून आता अंजली दमानिया यांनी तोफ डागली आहे.
विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर अडीच महिन्यांतच महायुतीच्या एका नेत्याला राजीनामा द्यावा लागला.
Related News
अलीगढ (उत्तर प्रदेश) :
अलीगढ शहरातील अतरौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका 'ख्वाजा' नावाच्या हॉटेलमध्ये एका मोठ्या वादाला तोंड फुटले आहे.
येथे जेवणासाठी आलेल्या ग्राहकांना देवी-दे...
Continue reading
नवी दिल्ली : तब्बल पाच वर्षांच्या खंडानंतर कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा एकदा 2025
मध्ये सुरू होणार आहे. भारत आणि चीनमधील द्विपक्षीय तणाव कमी झाल्यानंतर ही ऐतिहासिक यात्रा
पुन्हा ...
Continue reading
आई-पुत्राने मिळून फरशीच्या तुकड्याने केलं हत्येचं भयावह कृत्य
पुणे – चंदननगर परिसरात गुरुवारी रात्री एका तरुणाचा फरशीच्या तुकड्याने वार
करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे....
Continue reading
हायवे लगत झाडांना आग लावून पाडण्याचे कटकारस्थान; वनविभागाच्या निष्क्रियतेमुळे वाढत आहे धाडस
पातूर (ता.१८ एप्रिल): शहर व परिसरातील झाडे तोडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून
आता ‘...
Continue reading
अकोला –
ख्रिश्चन धर्मातील अत्यंत पवित्र आणि दु:खद दिवस मानला जाणारा गुड फ्रायडे अकोला
शहरात भक्तीभावाने साजरा करण्यात आला.
येशू ख्रिस्तांना क्रूसावर चढवण्यापूर्वी ज्या यातना देण...
Continue reading
जालना: एका महिन्याच्या चिमुरड्या मुलीला विहिरीत फेकणाऱ्या आई-वडिलांना अटक
जालना जिल्ह्यातील चंदनझिरा येथे माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.
अवघ्या एका महिन्या...
Continue reading
उत्तराखंडातील ऋषिकेशमध्ये राफ्टिंगदरम्यान एक हृदयद्रावक घटना घडली असून,
एका युवकाचा गंगा नदीत बुडून मृत्यू झाला आहे.
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत अ...
Continue reading
आज जय श्री राम ग्रुप ने परस गौ रक्षण केंद्र में गौसेवा का एक सराहनीय कार्य किया।
ग्रुप के सदस्यों ने मिलकर गौमाताओं को गर्मी से राहत देने हेतु 500 किलो तरबूज खिलाए।
गर्मी के ...
Continue reading
अकोला:
शहरासह अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये शुक्रवारी ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र सण
गुडफ्रायडे मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला.
शहरातील आठ प्रार्थनास्थळांमध्ये ...
Continue reading
बुरहानपूर (मध्यप्रदेश) –
येथे एक धक्कादायक घटना समोर आली असून,
अवघ्या १७ वर्षांच्या मुलीने आपल्या प्रियकर आणि त्याच्या तीन मित्रांच्या मदतीने
आपल्या २५ वर्षीय पतीचा निर्घृण खून ...
Continue reading
चित्तौडगड (राजस्थान) –
चित्तौडगडमधील कलेक्ट्रेटजवळील पंचायत समिती कार्यालयासमोर उभी असलेली
एक गॅसवर चालणारी कार अचानक पेटल्याने एकच खळबळ उडाली.
कारमध्ये लागलेल्या आगीत काही क्षण...
Continue reading
१७ एप्रिल २०२५ | अंबाजोगाई (जि. बीड) —
अंबाजोगाई येथील सनगाव गावात एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहे.
गावातीलच सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी महिला वकील ज्ञानेश्...
Continue reading
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते,
मंत्री धनंजय मुंडे यांना काल राजीनामा द्यावा लागला. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य मास्टरमाइंड आहे.
तो धनंजय देशमुख यांचा निकटवर्तीय असल्यानेच मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे.
धनंजय मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळांची सरकारमध्ये एन्ट्री होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
मात्र याच मुद्यावरून आता अंजली दमानिया यांनी तोफ डागली आहे. एक घाण गेली, दुसरी घाण येते हे दुर्दैवी आहे, अशा शब्दांत दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळांची सरकारमध्ये एन्ट्री होणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्यामध्ये यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.
डिसेंबर महिन्यात मंत्रिमंडळाचा विस्तार
झाला, त्यावेळी छगन भुजबळ यांचा समावेश झाला नव्हता.
त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्याच वेळी छगन भुजबळ यांच्या नाराजीची चर्चा रंगली होती.
मात्र आता धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्याने त्यांच्या जागी भुजबळ यांना मंत्रीमंडळात स्थान मिळू शकतं.
याच मुद्यावरून अंजली दमानियांनी रोखठोक भूमिका मांडली.
काय म्हणाल्या अंजली दमानिया ?
एक घाण गेली, दुसरी घाण येते हे दुर्दैवी आहे. ज्यांनी महाराष्ट्र सदनचा घोटाळा केला त्यांना मंत्रीपद कसं देऊ शकतात
असा सवाल अंजली दमानियांनी उपस्थित केला. एवढेच नव्हे तर, जर छगन भुजबळांना मंत्रीपद दिलं तर कोर्टात
जाऊन त्यांची बेल रद्द करण्याची मागणी करणार असल्याचेही दमानियांनी सांगितलं.
त्यामुळे छगन भुजबळांना मंत्रीपद मिळण्याच्या वाटेत मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यताही आहे.
गोरेंसारख्या व्यक्तीला मंत्रीमंडळातून काढून टाकलं पाहिजे
जयकुमार गोरेंसारख्या व्यक्तीला मंत्रीमंडळातून काढून टाकलं पाहिजे असं अंजली दमानिया म्हणाल्या.
पीडित महिलेसोबत आपण स्वतः राज्यपालांकडे जाणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.
विकृत व्यक्तींना मंत्रीमंडळात स्थान देऊ नका असी भूमिकाही दमानियांनी घेतली आहे.
मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात अंजली दमानिया अतिशय आक्रमर झाल्याचं पहायला मिळत आहे.
असा मंत्री जर मंत्रिमंडळात बसत असेल तर त्याला तिथून दूर करणे हे सरकारचं कर्तव्य आहे आणि अशा लोकांना
मंत्रिपदाची देण्याची काय गरज? चांगली लोकं सरकारला मिळत नाहीत का?
म्हणजे चांगली लोकं महाराष्ट्रात नाहीत का? का असे शोधून शोधून एक एक नग त्या मंत्रिमंडळात भरलेत मला तोच प्रश्न पडतोय असा सवालही अंजली दमानिया यांनी केला.
Read more here:
https://ajinkyabharat.com/dhananjay-munde-yancha-rajinamyacha-developed-chief-minister/