Sanjay Raut big statement : संजय राऊत यांनी महाविकास आघाडी अगोदरच विधानसभेच्या
विरोधी पक्षनेतेपदावर दावा ठोकला आहे. तर या नेत्याला पुन्हा एकदा मातोश्री वर यावं लागेल,
असं भाकित नाहीतर त्यांनी दावा दाखल केला आहे. काय म्हणाले राऊत?
Related News
नवसाळ फाट्याजवळ भीषण आग; गट्टू व ट्रक खाक, प्रशासनाची झोप उडाली
मूर्तिजापूर – अमरावतीहून नाशिककडे निघालेला गट्टू भरलेला ट्रक गुरुवारी रात्री ३
वाजता नवसाळ फाट्यानजीक अचानक पे...
Continue reading
पुण्यातील इंदापूरमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष शैलेश पवार
यांच्यावर महिलेचा छळ आणि गोळीबार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेने...
Continue reading
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीनंतर भारतीय संघात मोठे बदल अपेक्षित आहेत.
रोहितच्या ओपनिंग जागेसाठी युवा फलंदाज साई सुदर्शनचं नाव चर्चेत आहे.
सुदर्श...
Continue reading
बॉलीवूडची सदाबहार अभिनेत्री हेलेन या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत,
पण यावेळी त्यांच्या सिनेमामुळे नव्हे, तर त्यांच्या फिटनेस आणि जिंदादिलीमुळे. ८६ वर्षांच्या वयातही
हेलेन यांनी ...
Continue reading
गुजरात ATS ने नुकताच एक धक्कादायक खुलासा करत देशात सुरू असलेल्या सायबर गुप्तहेरगिरीच्या
मोठ्या मॉड्यूलचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत नाडियाड (गुजरात) येथून जसीम शाहनवाज अन्सारी...
Continue reading
अकोला –
शहरातील नवीन एसटी बस स्थानक चौकात आज दुपारी एक धक्कादायक प्रकार घडला.
बस टी पॉइंट जवळून अशोक वाटिकेकडे जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी
बसच्या मागील बाजूस एक ...
Continue reading
शिवर गावात आज जागतिक शून्य सावली दिन पारंपरिक वारकरी परंपरेने आणि संत
विचारांच्या प्रचार-प्रसाराने भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
श्री संत गजानन महाराज सेवा समिती, शिवर यां...
Continue reading
पृथ्वीवर मकरवृत्ताच्या दक्षिणेकडील आणि कर्कवृत्ताच्या उत्तरेकडील भागांत
सूर्य कधीच पूर्णपणे डोक्यावरून जात नाही. मात्र या दोन वृत्तांमधील स्थानिकांना वर्षातून
दोन वेळा सूर्य नेमक...
Continue reading
उत्तर भारतात प्रचंड उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना थोडी हवामान बदलाची दिलासा मिळणार आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २४ मे रोजी (शनिवार) आणि पुढील दोन दिवस दिल्ली-ए...
Continue reading
वाराणसी (उत्तरप्रदेश) – पाकिस्तान आणि POK मधील दहशतवादी तळांवर भारतीय सेनेने केलेल्या
‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईचा ठसा आता फक्त रणांगणातच नव्हे तर बनारसच्या हातमागावरही उमटला आहे.
ये...
Continue reading
पाटणा (बिहार): पाटणा-जयनगर दरम्यान ‘नमो भारत’ (वंदे मेट्रो) ट्रेन सुरू झाल्यानंतर
आता बिहारमधील दुसऱ्या मार्गावरही ही हायटेक वातानुकूलित ट्रेन धावण्याची शक्यता आहे.
पाटणा ते गयाज...
Continue reading
नॉटिंघम (ENG vs ZIM): तब्बल २२ वर्षांनंतर इंग्लंडच्या भूमीवर खेळण्यासाठी आलेल्या
झिम्बाब्वे संघाचा इंग्लंडने पहिल्याच दिवशी धुव्वा उडवला. टेस्ट क्रिकेट खेळतोय की T20,
असा संभ्रम ...
Continue reading
शिवसेना उद्धव ठाकरे गटाने महाविकास आघाडी अगोदरच विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा ठोकला आहे.
संख्याबळ कमी असले तरी यापूर्वी विरोधी पक्ष नेते पद देण्याचा इतिहास त्यांनी सांगितला आणि विधानसभा
अध्यक्षांनी संविधानाआधारे निर्णय द्यावा अशी मागणी केली. त्याचवेळी त्यांनी त्यांच्या जुन्या सहकाऱ्यावर टीका केली.
काल रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्याला राऊतांनी खणखणीत प्रत्युत्तर दिले आहे.
ते पुन्हा मातोश्रीवर येतील
रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली होती.
योगेश कदम यांच्या वक्तव्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये वाद उफळला. रामदास कदम यांनी ठाकरे यांना उद्ध्वस्त केले नाही
तर नाव सांगणार नाही असे वक्तव्य केले होते. त्यांचा वक्तव्याचा समाचार घेताना, त्यांना तसे वक्तव्य करू द्या.
त्यांच्या आयुष्याचे ते ध्येय असेल, असा चिमटा राऊतांनी काढला.
आमच्यात एवढं बळ आहे की ही जी विध्वंसक शक्ती आहे जे महाराष्ट्राचा विध्वंस करायला निघालेले आहे.
दिल्लीच्या मोघलाई बरोबर हात मिळवणी करून त्यांना रोखण्याची आणि इथं संपवण्याची ताकद उद्धव ठाकरे यांच्या
नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये परमेश्वराने आम्हाला दिलेली आहे. हे तुमचं फडफडणं तात्पुरतं आहे.
सत्ता असल्यामुळे तुमचे फडफडणे आहे. एक दिवस तुम्हाला पुन्हा मातोश्रीच्या दारात यावं लागेल.
शिवसेना भवनाच्या दारात यावं लागेल, हे आपले भाकीत नाही तर दावा आहे, असे राऊत म्हणाले.
याचवेळी त्यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर टीका केली.
हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. पण गृहराज्यमंत्र्यांनीच या प्रकरणाला वेगळ्या पायवाटा फोडल्या आहेत.
त्यामुलीने विरोध केला नाही. त्या मुलीने प्रतिकार केला नाही, असे गृहराज्यमंत्र्यांचे म्हणणे आहे.
मग तुम्ही प्रशिक्षण द्या, असा टोला त्यांनी योगेश कदम यांना लगावला.
राज्याचे गृहराज्यमंत्री अंसवेदनशील असल्याचा आरोप राऊतांनी पुन्हा एकदा केला.
असे मंत्री या राज्याला मिळाले हे दुर्दैव असल्याचा घाणाघात त्यांनी घातला.
Read more news here :https://ajinkyabharat.com/chief-minister-devendra-fadnavisanchaya-suchnantantar-mahan-motha-motha-decision-yatya-three-mahinayat/