महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे काऊंटडाऊन सुरु झाले
आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषद घेत
राज्यातील निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार येत्या २०
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
नोव्हेंबर २०२४ ला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडणार
आहे. त्यानंतर लगेचच तीन दिवसांनी २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा
निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. आगामी विधानसभा
निवडणुकांचे बिगुल वाजताच सर्वच राजकीय पक्षांकडून
मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे
महाविकासआघाडीच्या जागावाटपाची शेवटच्या बैठकीला सुरुवात
झाली आहे. त्यामुळे आजच महाविकासआघाडीचा फॉर्म्युला
फिक्स होणार असल्याचे बोललं जात आहे. यंदाची विधानसभा
निवडणूक महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी होणार आहे.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून
जागावाटपाचे सूत्र आखले जात आहे. त्यातच आता
महाविकासआघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला आजच ठरणार
असल्याचे बोललं जात आहे. सध्या महाविकासआघाडीची मुंबईत
एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुंबईतील सोफीटेल
हॉटेलमध्ये सुरु असलेल्या या बैठकीत जागावाटपावर
शिक्कामोर्तब केले जाणार आहे. महाविकासआघाडीतील
जागावाटपात विदर्भ आणि मुंबईतील काही जागांवरून पेच आहेत.
महाविकास आघाडीत काँग्रेस ११९, शिवसेना ठाकरे गट ८६ आणि
शरद पवारांची राष्ट्रवादी ७५ जागा, शेकाप ३, समाजवादी पक्ष २
आणि माकप २ जागा अशापद्धतीने जागावाटप होणार आहे.
महाविकासाघाडीचे आतापर्यंत २२२ जागांवर एकमत झालं आहे.
त्यात मुंबईतल्या १३ जागा ठाकरे गटाला, ८ जागा काँग्रेस, १
समाजवादी पार्टीला देण्याबाबत सहमती झाली आहे. तर
मुंबईतल्या ४ जागांवर तिन्ही पक्षांकडून रस्सीखेच आहे. त्यात
संभाव्य जागांमध्ये उमेदवारांची अदलाबदली होण्याची शक्यता
आहे. भाजपाविरोधात एकत्रित निवडणुकीला सामोरे जायचे यावर
तिन्ही पक्षांचं एकमत आहे. अनेक मुस्लीम बहुल जागांवर काँग्रेस
आणि शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/team-indias-lowest-run-score-in-the-country/