भाजप खासदार तथा अभिनेत्री कंगना राणावतला अखेर तिच्याच पक्षाने
घरचा आहेर दिला आहे. कंगना राणावतने शेतकरी आंदोलनाबाबत
केलेल्या वक्तव्यावर भाजप पक्षाने तिचे कान टोचले आहेत.
Related News
आठवड्यातून तीन दिवस अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था अकोटच्या अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड
शतकानुशिक परंपरेची साक्ष — आसरा माता यात्रा भक्तिभावात पार
ज्ञानेश्वर वरघट पेडगाव वार्ताहर कळंबा बोडखे येथील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
शेतकरी आत्महत्या ग्रस्त निराधार बालकांना शिक्षणासाठी मदतीचा हात; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आर्थिक मदत वाटप
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; अकोट तालुका आढावा बैठक उत्साहात पार
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी
गौण खनिज प्रकरणात पेंडींग असलेल्या दंडाची वसुली रखडली; तहसीलदारांवर टिका
परप्रांतीय कंपन्यांची मुजोरी मोडत स्थानिकांना मिळवून दिला रोजगार….
अकोटात सद्भावना आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन
भगवान महावीर जयंतीनिमित्त अकोल्यात भव्य रॅलीचे आयोजन
विशेष म्हणजे भाजपन अधिकृतपणे पत्र जाहीर करत याबाबत
भूमिका मांडली आहे. कंगना राणावतने केलेल्या वक्तव्याचा भाजप
पक्षाशी काहीच संबंध नाही, असं भाजपने अधिकृत पत्र जाहीर करत
म्हटलं आहे. कंगना राणावतने व्यक्त केलेले मत हे तिचं व्यक्तिगत
मत आहे. शेतकरी आंदोलनावेळी महिलांवर बलात्कार झाले होते,
असं वक्तव्य कंगनाने केलं होतं. तिच्या या वक्तव्यावर भाजपने भूमिका
जाहीर केली आहे. “भाजप खासदार कंगना राणावत यांनी शेतकरी
आंदोलनाच्या संदर्भात दिलेले विधान हे पक्षाचे मत नाही. कंगना राणावत
यांच्या विधानावर भारतीय जनता पक्षाने असहमती व्यक्त केली आहे.
पक्षाच्या वतीने, कंगना राणावत यांना पक्षाच्या धोरणात्मक मुद्द्यांवर
विधाने करण्याची परवानगी किंवा अधिकृतता नाही”, असं भाजपने म्हटलं आहे.
“भारतीय जनता पक्षाच्या वतीने कंगना राणौत यांना भविष्यात
असे कोणतेही वक्तव्य न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
भारतीय जनता पक्षाचा ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास
आणि सबका प्रयास’ आणि सामाजिक समरसता या तत्त्वांचे पालन
करण्याचा निर्धार आहे”, असं भाजपने स्पष्ट केलं आहे.
“शेतकरी आंदोलनादरम्यान हत्या आणि बलात्काराच्या घटना घडल्या.
बरं झालं केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे मागे घेतले. अन्यथा तिथे
मोठं षडयंत्र रचलं जात होतं. ते लोक काहीही करू शकले असते”,
असं वक्तव्य कंगनाने केलं होतं.
Read also: https://ajinkyabharat.com/emergency-movie-throne-khaali-karo-song-audience-bhetila/