भाजप खासदार तथा अभिनेत्री कंगना राणावतला अखेर तिच्याच पक्षाने
घरचा आहेर दिला आहे. कंगना राणावतने शेतकरी आंदोलनाबाबत
केलेल्या वक्तव्यावर भाजप पक्षाने तिचे कान टोचले आहेत.
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
विशेष म्हणजे भाजपन अधिकृतपणे पत्र जाहीर करत याबाबत
भूमिका मांडली आहे. कंगना राणावतने केलेल्या वक्तव्याचा भाजप
पक्षाशी काहीच संबंध नाही, असं भाजपने अधिकृत पत्र जाहीर करत
म्हटलं आहे. कंगना राणावतने व्यक्त केलेले मत हे तिचं व्यक्तिगत
मत आहे. शेतकरी आंदोलनावेळी महिलांवर बलात्कार झाले होते,
असं वक्तव्य कंगनाने केलं होतं. तिच्या या वक्तव्यावर भाजपने भूमिका
जाहीर केली आहे. “भाजप खासदार कंगना राणावत यांनी शेतकरी
आंदोलनाच्या संदर्भात दिलेले विधान हे पक्षाचे मत नाही. कंगना राणावत
यांच्या विधानावर भारतीय जनता पक्षाने असहमती व्यक्त केली आहे.
पक्षाच्या वतीने, कंगना राणावत यांना पक्षाच्या धोरणात्मक मुद्द्यांवर
विधाने करण्याची परवानगी किंवा अधिकृतता नाही”, असं भाजपने म्हटलं आहे.
“भारतीय जनता पक्षाच्या वतीने कंगना राणौत यांना भविष्यात
असे कोणतेही वक्तव्य न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
भारतीय जनता पक्षाचा ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास
आणि सबका प्रयास’ आणि सामाजिक समरसता या तत्त्वांचे पालन
करण्याचा निर्धार आहे”, असं भाजपने स्पष्ट केलं आहे.
“शेतकरी आंदोलनादरम्यान हत्या आणि बलात्काराच्या घटना घडल्या.
बरं झालं केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे मागे घेतले. अन्यथा तिथे
मोठं षडयंत्र रचलं जात होतं. ते लोक काहीही करू शकले असते”,
असं वक्तव्य कंगनाने केलं होतं.
Read also: https://ajinkyabharat.com/emergency-movie-throne-khaali-karo-song-audience-bhetila/