वटपौर्णिमा -अक्षय वृक्ष प्राणवायू देणारा वड

वटपौर्णिमा -अक्षय वृक्ष प्राणवायू*देणारा वड

वडाचे झाड 70% ऑक्सिजन पर्यावरणास देते .म्हणून वडाचे झाड पर्यावरणास महत्त्वाचे आहे.

वडाचे झाड जिथे असते तेथे भरपूर प्रमाणात प्राणवायू असतो. वटवृक्षाचे वैद्यकीय सल्ल्यानुसार सेवन केल्याने

आपल्या शरीरातील मुख्यदोषांपैकी कफ आणि पित्त हे दोन दोष शांत करता येतात.

Related News

वडाच्या झाडाला अक्षय वृक्ष किंवा संसार वृक्ष असेही म्हणतात .वडाचे झाड हे पाचशे गॅलोन शुद्ध हवा पर्यावरणास सोडते.

म्हणून वडाच्या झाडाखाली भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळतो या वृक्षाला नॅचरल व्हेंटिलेटर सुद्धा म्हटले जाते.

वडाच्या झाडाची साल, पाने, अंकुर आणि पारंब्या या अनेक प्रकारच्या विविध आजारावर वापरल्या जातात.

वडाच्या झाडाचा संधिवातामध्ये तसेच आमवात ,केस गळती आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार पोटाच्या आजारासाठी उपयोग होतो.

वडाच्या झाडातून निघणारा चीक हा जखमा भरून काढण्यासाठी वापरतात. वडाच्या झाडाचे आयुष्य हे हजारो वर्ष असते.

या झाडाच्या खोडामध्ये फांद्यामध्ये विष्णूचे स्थान असते तसेच मुळामध्ये ब्रह्माचा वास असतो तसेच शेंड्यामध्ये भगवान शंकर स्थित आहे असे मानले जाते.

या दैवी वृक्षाच्या छायेखाली साधना व्रत केल्यास मनोकामना पूर्ण होते असे मानले जाते.

पूजेच्या निमित्ताने का होईना स्त्रिया या झाडाच्या सानिध्यात जास्त वेळ राहतात त्यामुळे त्यांच्या आरोग्यासाठी चांगले आहे

सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण यमा कडून परत आणले ते याच दिवशी तो दिवस म्हणजे जेष्ठ मासातील पौर्णिमेचा म्हणजेच वटपौर्णिमा .

जेव्हा यमराज सत्यवानाचे प्राण नेण्यासाठी आला होता .त्यावेळेस वटवृक्षाखाली सत्यवानाचे मृत शरीर सावित्रीच्या मांडीवर होते.

परंतु जेव्हा यमराज सत्यवानाला घेऊन जात होते .त्यावेळेला सावित्री सुद्धा यमाच्या मागे मागे गेली. यमराजाने तिला परत जायला सांगितले.

परंतु तिने माझा पतिव्रता धर्म आहे त्यामुळे मी इथुन जाणार नाही या तिच्या साहसीवृत्तिला प्रसन्न होऊन सावित्रीला त्याने तीन वर मागायला सांगितले .

पहिला वर होता सासू-सासऱ्यांच्या डोळ्यांची ज्योती परत आणणे .दुसरा होता त्यांचे गेलेले राज्य पुन्हा मिळवणे.

तिसरा होता शंभर पुत्रवती होण्याचा आशीर्वाद. त्यामुळे आता यमराज वचनबद्ध झाले असल्यामुळे यमराजाला सावित्री हुशारीने म्हणाली,”

सत्यवानाचे प्राण तुम्हाला मला परत द्यावेच लागतील “नंतर सावित्री सत्यवानाचे शरीर वटवृक्षाखाली मृतावस्थेत होते तिथे गेली

तिने वटवृक्षाला प्रदक्षिणा घातल्या आणि पाहते तर काय ?सत्यवानाचे प्राण परत आले होते सत्यवान जिवंत झालेला होता.

म्हणूनच स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी वटवृक्षाला साकडे घालतात .

पतीच्या चांगल्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी सुवासिनी ही स्त्रिया नटून-थटून या वटवृक्षाची पूजा करतात.

हे व्रत ज्येष्ठ त्रयोदशी पासून ते पौर्णिमेपर्यंत तीन दिवस करतात. हिंदू शास्त्रात वटवृक्षाला पवित्र मानले जाते.
वडाचे झाड बहुगुणी
उपयोग करा सर्वांनी
वडाचे झाड लावूया
करूया संकल्प सर्वांनी

अर्चना वऱ्हाडपांडे
शिक्षिका श्री गणेशदासराठी विद्यालय
अमरावती

Read Also : https://ajinkyabharat.com/vatpaulranima-is-a-fast-and-tradition/

Related News