हिंदू धर्मशास्त्रानुसार वटपोर्णिमा म्हणजे हिंदू स्त्रियांचा एक महत्त्वाचा सण आहे.वटवृक्ष हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे.
वटपौर्णिमा हा सण याच झाडाशी संबंधित आहे. हा उत्सव महाभारतात वर्णन केलेल्या सावित्री आणि सत्यवान यांच्या आख्यायिकेवर आधारित आहे.
वटपौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमेला हा सण महाराष्ट्रात अत्यंत उत्साहात स्त्रिया साजरा करतात.
Related News
या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतात व वटवृक्षाचे मनोभावे पूजन करतात.
आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभावे याकरिता वडाच्या झाडाचे पूजन करतात.
ही एक प्रथा, परंपरा असली तरी निसर्गाप्रती व आपल्या सांसारीक आयुष्यप्रती कृतज्ञता हाच सांस्कृतिक भाव आहे.
वड हा यज्ञवृक्ष असून यज्ञपात्रे याच झाडाच्या लाकडाची बनवतात.चार वेदांपैकी ऋग्वेद व अथर्ववेदात वडाचा उल्लेख आढळतो.
ब्रम्हा विष्णू महेश यांचे निवासस्थान या वृक्षावर आहे असे मानले जातात.
हिंदू बौद्ध आणि इतर परंपरांमध्ये पूजनीय असलेले वडाचे झाड अमरत्व, अध्यात्मिक,ज्ञान आणि ज्ञानाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते.
त्याची खोलमुळे आणि विस्तृत छत जीवनावर चिंतन करण्यास प्रेरणा देतात.वडाच्या झाडाला अक्षयवृक्षही म्हणतात.
अक्षय्य म्हणजे ज्याचा क्षय होत नाही.वटवृक्षाचा कधीही क्षय होत नाही.ते कायम वाढतच राहते.वडाच्या पारंब्या जमिनीतून पुन्हा पुन्हा
जन्म घेऊन वडाचा विस्तार वाढत जातो. वडाच्या झाडाचे आयुष्य हजारो वर्षे असते.
भारतीय संस्कृतीमध्ये वडाच्या झाडाचे असाधारण महत्त्व विषद केले आहे.
वडाचे झाड जवळ जवळ 60 टक्के प्राणवायू हवेत सोडते आधुनिक भाषेत वटवृक्ष नैसर्गिक व्हेंटिलेटर चे काम करतो.
आणि म्हणूनच आपोआप त्याच्या आसपास राहणाऱ्या लोकांना सहजपणे शुद्ध प्राणवायू मिळत असतो.एक पूर्ण वाढलेले वडाचे झाड
एका तासाला 712 किलो इतक्या प्रचंड प्रमाणात प्राणवायू वातावरणात सोडत असते.वडाच्या झाडाखाली वेळ व्यतीत करणे
म्हणजे शरीराला आवश्यक असणाऱ्या प्राणवायूची पूर्णता भरून काढणे होय. वडाच्या काटक्यांचा उपयोग होम हवनात व यज्ञात समिधा म्हणून करतात .
वडाचे झाड हे शिवशंकराचे स्वरूप मानले गेले आहे. आणि वडाच्या पारंब्या या शिवाच्या जटा आहेत असे समजले जाते.वडाच्या झाडाच्या प्रत्येक
फांदी पारंब्या व पानापासून सुद्धा नवीन वटवृक्ष जन्म घेते म्हणून त्याला अनादी अनंत असा अक्षय म्हटले गेले आहे.
त्याच्या ह्या काळातील अस्तित्वामुळे स्त्रिया त्याला अखंड सौभाग्याचे साकळे घालतात .वडाच्या झाडाला फळे येतात
आणि ती फळे अनेक पक्षी, वटवाघुळे,खारी, माकडे खातात आणि एक प्रकारे ते विजारोपण सुद्धा त्याद्वारे होते.
आयुर्वेदात वटवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.त्यामुळे त्याची मुळे,पाने, फुले,फळे, साल, पारंब्या या सगळ्यांचा औषधी उपयोग होतो
व त्यातून असंख्य आजारांवर उपचार करता येतात. वडाचा जीवनकाळ खूप मोठा आहे. वड स्वच्छ हवा प्रदान करतो. त्याची तोड
न होण्यासाठी व पुढच्या पिढीला त्याचे महत्त्व कळून येण्यासाठी प्रथेनुसार वटपूजन केले जाते.प्रथेमुळे का होईना वडाचे महत्त्व टिकून आहे.
स्त्रिया वडाचे पूजन करून वडाचे महत्व पुढच्या पिढीकडे पोचवत आहेत. भक्तीच्या मार्गाने सुद्धा असाध्य ते साध्य करून घेता येते.
वटवृक्षाखाली सावित्रीला सत्यवानाचे प्राण परत मिळाले असे समजले जाते. तसेच वटवृक्षाखाली ब्रम्हा- विष्णू- महेश आणि
श्री. स्वामी समर्थ महाराजांचे नित्य वास्तव्य मानले जाते.
स्त्रिया सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून वटवृक्षाची पूजा करतात कारण सावित्रीला सत्यवानाचे प्राण
वडाच्या झाडाखालीच परत मिळाले. वडाच्या झाडापासून भरपूर ऑक्सिजन ,सावली व औषधी गुणधर्म आहेत.
निसर्गतः वड,पिंपळ यासारख्या दीर्घायुषी वृक्षाऺचे पूजन पवित्र मानले जाते. एखादा वृक्ष पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही.
वडाच्या झाडाला धार्मिक, वैज्ञानिकआणि सामाजिक दृष्ट्या महत्त्व आहे. हे झाड भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र मानले जाते.
वडाचे झाड अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांशी संबंधित आहे.
झाड आणि पर्यावरण हे समीकरण जाणून घेऊन वडाच्या झाडांचे वृक्षारोपण व्हायला पाहिजे.
आज शासनाच्या जागृतीमुळे रस्त्याच्या दुतर्फा भरपूर वडाची झाडे पाहायला मिळतात.
अशीच जागरूकता सामाजिक व्हायला पाहिजे.वटवृक्षांचे वृक्षारोपण व्हायला पाहिजे.
काही स्त्रिया वटवृक्षाचे पूजनासाठी जाऊ शकत नाही तेव्हा वटवृक्षाची फांदी घरी आणतात व त्याचे पूजन करतात .
परंतु अशी झाडाची हानी न करता एक वटवृक्ष वटपौर्णिमेला स्त्रियांनी घरामध्ये लावावा व त्याची पूजा करावी.
त्याचे फायदे त्या घरातील कुटुंबाला मिळतील.तसेच स्त्रियांनी वटपौर्णिमेला एक वटवृक्ष तरी लावावा हा संकल्प केला पाहिजे.
जेणेकरून वटवृक्षांचे वृक्षारोपण होईल. जर घरामध्ये जागा नसेल तर कुंडीत लावावा व कुंडीतही लावता येत नसेल तर
आपल्या गल्लीत लावावा आणि गल्लीतही जागा नसेल तर माळरानावरती या दिवशी प्रत्येक स्त्रीने एक वटवृक्ष लावावा.
यामुळे वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढेल व शुद्ध प्राणवायू सर्वांना मिळेल.
असे हे वडाचे झाड बहुगुणी आहे. सर्वांनी याची जोपासना करायला हवी.या वृक्षाचे संवर्धन व जतन करावे.
लेखिका
विजया शंकरराव झाडे
मुख्याध्यापिका
जिल्हा परिषद शाळा,कुसुमकोट बु.
ता.धारणी
जी.अमरावती.