वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; मात्र विमा कंपनीचे दुर्लक्ष

वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; मात्र विमा कंपनीचे दुर्लक्ष

दानापूर (प्रतिनिधी):

पंधरा ते वीस दिवसांपूर्वी दानापूर परिसरात आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने आणि गारपिटींनी

शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.

Related News

यामध्ये दानापूर येथील शेतकरी निखिल रामराव मिसाळ यांचे प्रचंड नुकसान झाले असून त्यांच्या

सर्वे नं. ३६३ मधील एक हेक्टर ६२ आर क्षेत्रातील केळीचे घड व झाडे पूर्णपणे मोडून पडली आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांचे अंदाजे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, असे त्यांनी सांगितले.

दिनांक १६ मे २०२५ रोजी या नुकसानीची माहिती मिसाळ यांनी व अन्य शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक १४४४७ वर दिली होती.

त्यानंतर स्थानिक पटवारी अंकुश मानकर आणि कृषी सहाय्यक महेश इंगळे यांनी प्रत्यक्ष

पाहणी करून पंचनामा तयार केला व शासनाकडे अहवालही सादर केला.

मात्र, विमा कंपनीने अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही. मिसाळ यांच्या मते, त्यांनी दिनांक २६ ऑक्टोबर २०२४ रोजी विमा

कंपनीकडे अधिकृतपणे विमा हप्ता भरलेला असूनही, आजतागायत कंपनीकडून कोणतेही सर्वेक्षण किंवा नुकसानीचे मूल्यांकन झालेले नाही.

वारंवार तक्रार करूनही विमा कंपनीने दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

“शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीचा सन्मान करून योग्य ती भरपाई देणे हे विमा कंपनीचे कर्तव्य आहे.

मात्र कंपनीकडून आमच्याकडे केवळ दुर्लक्षच झाले आहे.

ही शेतकऱ्यांसोबतची घोर अन्यायकारक बाब आहे,” असे मिसाळ यांनी सांगितले.

त्यांनी विमा कंपनीला नोटीस देत असा इशारा दिला आहे की,

जर लवकरात लवकर निर्णय घेण्यात आला नाही, तर ही तक्रार ग्राहक मंचासमोर नेण्यात येईल.

Read Also : https://ajinkyabharat.com/chief-officer-dr-bambare-yancha-sanman-kartana-and-bharsaka-and-others/

Related News