बाळापूर (१२ जून) – निंबा अंदुरा सर्कल अंतर्गत गट ग्रामपंचायत मोखा जानोरीमेळ परिसरात
बुधवारी दुपारी अचानक आलेल्या वादळामुळे जानोरीमेळ गावात मोठे नुकसान झाले आहे.
अवघ्या २० मिनिटांच्या वादळात अनेकांच्या घरावरील पत्रे, अँगलसह उडून गेले,
Related News
“पुन्हा एकत्र येणार काका-पुतणे? शरद पवारांनी भाजपला ठेवला दूर, युतीसाठी अजित पवारही पर्यायात”
विठ्ठल मोहोड यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने सन्मानित.
मुर्तिजापूर; रोशनपुऱ्यात थंडपेयाच्या दुकानास भिषण आग:
‘विमानने पकडली अचानक वेग आणि तात्काळ बंद झाल्या लाइट्स…’ – बचावलेल्या विश्वास कुमार यांचा थरारक अनुभव
गौतम गंभीर भारतात परतला; आईला हृदयविकाराचा झटका,
कोंडोलीत नानाजी देशमुख कृषी संजवनी प्रकल्पाचे भव्य उद्घाटन; ग्रामस्तरावर सूक्ष्म नियोजनाला सुरुवात
गोपनीय माहितीवरून कारवाई; बाळापुरात गोवंशांची निर्दय वाहतूक उघड, 3 गोवंशांना दिलं जीवनदान
व्यापाऱ्यांच्या माल ओट्यावर व शेतकऱ्यांचा माल उघडयावर मंगरूळपीर कृषी उत्पन्न बाजार समीतीत प्रकार
घोडेगाव तेथे तुफान वादळी वाऱ्याने कित्येकाचे संसार उघड्यावर
अहमदाबाद विमान अपघातात 240 हून अधिकांचा मृत्यू; अकोल्याची ऐश्वर्या तोष्णीवाल थोडक्यात बचावली!
सावरगाव ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार
मोठा खुलासा! क्रॅश झालेल्या विमानात आधीच होती बिघाडाची लक्षणं;
शेतमाल आणि घरातील जीवनावश्यक वस्तू पाण्यात वाहून गेल्या.
रमेश परघर मोर यांच्या धान्याच्या गोडाऊनवरील तीन पत्रे अँगलसह उडून गेली.
त्यांच्या गोदामातील १५ पोते ज्वारी, १२ पोते गहू, ६ पोते हरभरा व ८ पोते तुर पाण्यात खराब झाले.
प्रकाश परघर मोर व संजय परघर मोर यांच्या राहत्या घरावरचे संपूर्ण पत्रे अँगलसह उडून गेले.
त्यांच्या टीव्ही, फ्रिज, सोफासेट, पंखे, शालेय साहित्य, गॅस शेगडी, कपडे व किराणा माल यांसह संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला.
या घटनेची तत्काळ दखल घेत तहसीलदार बाळापुर यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी आकाश वानखडे,
ग्रामसेवक कैलास संस्कार, सरपंच पती श्री. हर्ष खरप, पंचायत सदस्य बबलू देशमुख,
तसेच शेतकरी संघटनेचे अनिल धुमाळे, रोजगार सेवक संघटनेचे
जीवन परघर मोर व सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण तायडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
संकटग्रस्त कुटुंबांना तातडीने साखर, तांदूळ, डाळी, मसाले, चहा,
आटा यांचा किराणा साहित्याचा पुरवठा करण्यात आला.
जखमींना वैद्यकीय मदतीसाठी तात्काळ निंबा येथे दाखल करण्यात आले.
सरपंच पती श्री. हर्ष खरप व पंचायत सदस्य बबलू देशमुख यांनी सांगितले की, “शासनस्तरावरून या कुटुंबांना
लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमदार नितीन बापू देशमुख
यांच्या माध्यमातून सरकार दरबारी मदतीची मागणी लवकरच केली जाणार आहे.”
जानोरीमेळप्रमाणेच वझेगाव येथेही रवींद्र माळी व गणेश माळी यांच्या घराचे नुकसान झाले
असून स्थानिक प्रशासन आणि पंचायत समितीच्या प्रतिनिधींनी तिथेही भेट देऊन मदतीचे आश्वासन दिले आहे.
प्रभावितांनी व्यक्त केलेली भावना:
“निसर्गाच्या रौद्र रूपापुढे माणूस हतबल ठरतो, आमचा काळ आला होता पण वेळ नव्हती…” – प्रकाश आणि संजय परघर मोर