वृत्तसेवा – अतुल नवघरे
लाखपुरी (ता. १० एप्रिल) : मुर्तिजापूर तालुक्यातील दुर्गवाडा फिटर अंतर्गत येणाऱ्या लाखपुरीसह इतर गावांमध्ये
सतत लाईन चालू-बंद होत असल्यामुळे नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे.
Related News
उमरा उपकेंद्राची घोर निष्काळजी — मेंढीपालाचा जीव थोडक्यात वाचला,
मशालीतून उठली आग – शेतकरी आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी ‘प्रहार’चा एल्गार!
२४ तासांत जबरी चोरीचा पर्दाफाश; अकोला पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी
सोनं 1 लाख पार करणार? – तज्ज्ञांच्या अंदाजांमधून गुंतवणूकदार संभ्रमात!
जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना ठार मारण्याची धमकी; मुख्यमंत्री कार्यालयाला ईमेल
अहमदाबादमध्ये अपार्टमेंटला आग; धडकी भरवणाऱ्या १८ जणांच्या रेस्क्यूचा थरार
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून राजू शेट्टी आक्रमक
अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांच्या घरासमोर प्रहार जनशक्ती पक्षाचं मशाल आंदोलन
बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी अकोटमध्ये ४०० नागरिकांची स्वाक्षरी
Saif Ali Khan Attack Case: 16 हजार पानी आरोपपत्रात गंभीर खुलासे; करीना कपूरचा पोलिसांना सविस्तर जबाब
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्य शासनाचा उपक्रम – 14 व 15 एप्रिलला मोफत टूर सर्किट
किन्हीराजा : श्री शिवाजी हायस्कूलला दीड लाखांचे आरोप्लॅन्ट भेट – श्रीकृष्ण सोनुने यांचे योगदान
दिवस आणि रात्रीच्या वेळी वारंवार वीजपुरवठा खंडित होण्यामुळे जनतेमध्ये संतापाचे वातावरण आहे.
या विजेच्या अडचणीमुळे फ्रिज, टीव्ही, कॉम्प्युटर, पंखे यासारख्या विद्युत उपकरणांचे नुकसान
होण्याची शक्यता वर्तवली जात असून नागरिकांचे आर्थिक नुकसानही होऊ शकते.
नागरिकांचे म्हणणे –
-
“लाखपुरी सह इतर गावांमध्ये लाईन बंद राहत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महावितरणने याकडे लक्ष द्यावे.”
– सौ. मीनल नवघरे (माजी पं.स. सदस्या, लाखपुरी) -
“सतत लाईन जात असल्यामुळे घरातील उपकरणांची हानी होऊ शकते. महावितरण विभागाने त्वरीत पावले उचलावीत.”
– अॅड. दत्तराज देशमुख (लाखपुरी) -
“या समस्येमुळे गावातील जनतेला नाहक त्रास होत आहे. तीव्र निषेध करतो.”
– पुरुषोत्तम डागा (लाखपुरी)
महावितरणचे स्पष्टीकरण –
याबाबत ज्युनिअर इंजिनिअर अनिकेत भोंदाणे म्हणाले की, “हवामानाच्या बदलामुळे कधी कधी ट्रिपिंग होते.
मात्र आठ दिवसांत ही समस्या सोडवली जाईल.”
नागरिकांची मागणी आहे की दुर्गवाडा फिटर अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांमधील लाईन
समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढावा व महावितरण विभागाने तातडीने याकडे लक्ष द्यावे.