उंबर्डा बाजार : (वार्ताहर)
गेल्या दोन दिवसापासून मान्सून पावसाची जोरदार हजेरी लागत आहे.
त्यातच सायंकाळी पडलेल्या दमदार पावसामुळे उंबर्डा बाजार वासीयांची चांगलीच तारांबळ उडाली.
Related News
अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज बिरसा क्रांती दल यांच्यावतीने एक दिवसीय धरणे
आंदोलन करण्यात आले यावेळी आदिवासींचे शिक्षण व नोकरी या क्षेत्रामध्ये गैर आदिवासींनी खोटे
सर्ट...
Continue reading
मे महिना संपून पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असतानाही मुर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर गावातील नाल्यांचे उपसण अद्याप झालेले नाही.
परिणामी ठिकठिकाणी नाल्यांचे घाण पाणी रस्त्यावरून वाह...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील दाळंबी गावातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सीईओ यांच्या
दालनासमोर ठिय्या आंदोलन केलं आहे. दाळंबी गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर...
Continue reading
प्रतिनिधी | अकोला
अकोला शहरातील वसंत देसाई स्टेडियमजवळ आज (शनिवारी) पहाटे चारच्या सुमारास
मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका इसमाच्या ई-बाईकला अचानक आग लागल्याची घटना घडली.
प्रसंगावध...
Continue reading
एमआयडीसी पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या कुंभारी परिसरात १५ जुन रोजी राजकुमार चौहान
नावाच्या तरुणाने त्याच्या सोशल मीडिया इंस्टाग्रामवर पैगंबर मोहम्मद आणि कुराण-ए-पाक
यांच्यावर ...
Continue reading
अकोट तालुका प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील ग्राम पंचायत बोर्डी येथील घरकुल योजनेच्या बांधकामाची व भ्रष्टाचाराची पथका मार्फत चौकशी करण्यात यावी.
या बाबत दिनांक ११/४/२०२५ रोजी गटवि...
Continue reading
अकोट तालुका प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यात प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अंमलबजावणीतून शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याचा
धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.फळबाग संत्रा मृग बहार आणि...
Continue reading
राज्यात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत असून नुकताच राज्याचे उपमुख्यमंत्री
अजित पवार यांच्या ताब्यातील रुग्णवाहिकेचा अपघात तीन दिवसांपूर्वी झाला होता.
यादरम्यान मृद व जलसंधार...
Continue reading
कुंभारी एक छोटसं गाव फार तर तिथे जायला अकोल्यावरूनदहा मिनिट लागतील.
एक जुलै 1977 रोजी एका तुकाराम बिडकर नावाच्या ध्येय वेड्या व्यक्तीने जय बजरंग व्यायाम शाळेची स्थापना केली.
...
Continue reading
मुर्तीजापुर तालुका प्रतिनिधी फोटो नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समितीच्या संदर्भात
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाची बैठक मुर्तीजापुर येथे आयोजित करण्यात आली होती.
या बैठ...
Continue reading
अमरावती प्रतिनिधी । शेतकऱ्यांची कर्जमाफी, पिकाला हमीभाव यांसह विविध १७ मागण्यासाठी प्रहार जनशक्ती
पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांचे मोझरी येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन ...
Continue reading
राज्य सरकारने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण व डोंगराळ भागातील नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
जून ते ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या संभाव्य वाहतूक अडचणींचा विचा...
Continue reading
ग्रामपंचायत ने केलेल्या उपायोजना केवळ कागदावरच असल्यामुळे पाचही वार्डातील मान्सूनपूर्व नालीसफाई न केल्याने
नाली मधील गाळ रस्त्यावर आल्याने सर्वत्र घाणीचे व दुर्गंधी चे साम्राज्य निर्माण झाले आहे.
त्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
उंबर्डा बाजार येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्या अफलातून कारभार नेहमीच चर्चेत असतो.
सांडपाण्याची व्यवस्था करने, सफाई करणे, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही याची काळजी घेऊन उपाययोजना करणे
असे ग्रामपंचायत प्रशासनाचे काम असते मात्र ग्रामपंचायतीने केलेली सर्व उपाययोजना कागदावरच राहिल्याने
याची पोलखोल आलेल्या पावसाने करून दिली. परिसरातीत पावसाने हजेरी लावली आहे .
यामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक सुखावला असला तरी उंबर्डा बाजार ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्काळजी पणामुळे
उंबर्डा बाजार मधील ग्रामस्थ चांगलेच संकटात सापडला आहे.
पावसाळ्यात आनंद घेण्याऐवजी या पाचही वार्डातील नागरिक चांगलेच कामाला लागले.
नाल्याची साफसफाई न केल्याने असा प्रकार घडला नाली मध्ये गाळ साचून तुडुंब भरल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून वाहिले.
यामुळे नाल्यातील संपूर्ण गाळ रस्त्यावर आला आहे. ग्रामपंचायत प्रशासन दरवर्षी लाखो रुपये कर
गोळा करून सुद्धा कोणतेही काम करत नसल्यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
पावसाळ्यात नागरिकांना चांगला त्रास सहन करावा लागत आहे.
उंबर्डा बाजार येथील भवानी मंदिर मुख्य रस्त्यावर चिखल साचल्यामुळे रस्त्याची दैयनीय अवस्था झाली आहे.
याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य वेळेत लक्ष दिले असते तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती.
साथीचे रोग डोके वर काढण्याची दाट शक्यता उंबर्डा बाजार मधील पाचही वार्डात निर्माण झाली आहे.
या बाबत नागरिकांनी उंबर्डा बाजारचे ग्रामविकास अधिकारी श्री जयकिसन आडे
यांचे सोबत भ्रमणध्वनी वरुण संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
तसेच शासनाच्या विविध योजनांना ग्रामपंचायत तर्फे केराची टोपली दाखविली जात आहे.
शासनाच्या घनकचरा निर्मूलन व स्वच्छता मिशन च्या योजना कुचकामी ठरत आहे.
याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने लक्ष देऊन चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थामधून पुढे येत आहे.
परिसरात दुर्गंधीचे वातावरण
जोरदार पावसामुळे केरकचऱ्याने तुडुंब भरलेल्या नाल्यातील कचरा रस्त्यावर आला त्यामुळे ५ ही वार्डा मध्ये दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे.
परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. याला ग्रामपंचायत प्रशासनच जबाबदार आहे.
अशी प्रतिक्रिया सर्वस्तरावरून व्यक्त होऊ लागली आहे.
Read Also :https://ajinkyabharat.com/akola-tribal-hakkansathi-birsa-kranti-dal-chhanta-dharana-movement-nidhi-and-certificate-scam/