नाशिकमध्ये भारतीय सैन्यातील दोन अग्नीवीरांचा मृत्यू झाल्याची
घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. तोफेचा गोळा लोड करत
असताना ब्लास्ट झाला. त्यात अग्नीवीर गोहिल सिंग (वय 20)
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
आणि सैफत शित (वय 21) गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने
देवळाली येथील सैनिकी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल
करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित
केले. आयएफजी फील्ड गणचा तुकडा शरीरात घुसल्याने त्यांचा
मृत्यू झाला. नाशिकच्या देवळाली पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद
करण्यात आली आहे. नाशिकमधील देवळाली कॅम्पमध्ये भारतीय
लष्कारातील जवानांना प्रशिक्षण देण्यात येते. देशात अग्नीवीर
योजना सुरु झाल्यापासून अग्नीवीर योजनेतील सैनिकांचे प्रशिक्षण
नाशिकमधील देवळाली भागात होते. या प्रशिक्षणा दरम्यान दोन
अग्नीवर जवानांना तोफेचा गोळा लोड करण्याचे प्रशिक्षण दिले
जात होते. त्यावेळी अचानक स्फोट झाला. या स्फोटामध्ये गोहिल
सिंग आणि सैफत शित गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने
रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्यांचा मृत्यू झाला होता. या
प्रकरणामुळे खळबळ उडली आहे. आता पोलीस आणि
लष्कराकडून या घटनेची चौकशी करण्यात येणार आहे.
गुरुवारी दुपारी १२ वाजता अग्नीवीर जवानांची तुकडी
नाशिकमधील शिंगवे बहुलाला फायरिंग रेंजमध्ये सरावासाठी गेली
होती. यावेळी तोफेजवळ गोळ्याचा स्फोट झाला. त्यामुळे बॉम्बचे
शेल उडून त्या अग्नीवीर जवानांच्या शरीरात गेले. या घटनेत दोघ
जवानांचा मृत्यू झाला. तसेच एक अग्निवीर जखमी झाला आहे.
त्याच्यावर लष्कराच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/mns-president-raj-thackerays-letter-to-narendra-modi/