हैदराबाद: अमरावतीच्या खासदार आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या नवनीत राणा त्यांच्या विधानामुळे वादात सापडल्या आहेत. राणा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी एमआयएमनं निवडणूक आयोगाकडे केली आहे. राणा यांच्या विधानामुळे दोन समुदायांमध्ये तणाव वाढू शकतो, असं एमआयएमचे प्रवक्ते वारिस पठाण यांनी म्हटलं.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणांनी हैदराबाद लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार माधवी लतांच्या समर्थनार्थ प्रचारसभा घेतली. या सभेतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘१५ सेकंदांसाठी पोलिसांना बाजूला करा. ओवैसी बंधूंना कळणारही नाही ते कुठून आले आणि कुठे गेले,’ असं विधान राणा यांनी सभेत केलं.
‘एक लहान आणि एक मोठा भाऊ आहे. लहान भाऊ म्हणतो, पोलिसांना १५ मिनिटांसाठी हटवा, मग आम्ही दाखवतो आम्ही काय करु शकतो. त्या लहान भाऊला मला सांगायचंय, तुला १५ मिनिटं लागतील. आम्हाला तर केवळ १५ सेकंद लागतील. १५ सेकंदांसाठी पोलिसांना बाजूला करा. लहान-मोठ्याला कळणारही नाही कुठून आले आणि कुठे गेले. आम्हाला केवळ १५ सेकंद पुरेशी आहेत,’ असं राणा म्हणाल्या. हा व्हिडीओ राणा यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी अकबरुद्दीन ओवैसी आणि असदुद्दीन ओवैसी यांना टॅग केलं आहे.
Related News
मुंबई प्रतिनिधी |
भारताचे सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान ‘अँटिलिया’ ही केवळ एक इमारत नसून एक भव्य आणि विलासी राजवाडाच आहे.
मुंबईतील या 27 मजली गगनचुंबी इम...
Continue reading
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे शिक्षण, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचे प्रतीक.
त्यांच्या विचारांनी पिढ्यानपिढ्या प्रेरणा घेतली. याच महामानवाची जयंती १४ एप्रिल रोजी शेकापूर फाटा
...
Continue reading
मूर्तिजापूर |
तालुक्यातील भटोरी गावात शनिवारी (१२ एप्रिल) एक हृदयद्रावक घटना घडली.
सुधाकर वामनराव ठाकरे (वय ६०) या वयोवृद्ध शेतकऱ्याचा स्वतःच्या ट्रॅक्टरखाली दबून दुर्दैवी मृत्यू...
Continue reading
अकोला |
पातूर तालुक्यातील पातूर-तुळजापूर रस्त्यालगत असलेल्या गावठाण परिसरात एका ६०
वर्षीय वृद्धाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची खळबळजनक घटना काल (रविवार) रात्री उघडकीस आली आहे...
Continue reading
अकोला :
प्रभू येशू ख्रिस्ताच्या यरुशलेममध्ये विजयदर्शक प्रवेशाची स्मृती म्हणून संपूर्ण जगभर साजरा केला जाणारा पाल्म संडे
(झावळ्यांचा रविवार) अकोला शहर आणि जिल्ह्यातही मोठ्या भक्त...
Continue reading
अकोला: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त अकोल्यात
एक प्रेरणादायी आणि अभूतपूर्व उपक्रम राबवण्यात आला आहे.
अकोला शहरातील जुन्या बस स्थानक परिसरात तब्बल १८...
Continue reading
प्रतिनिधी: रामेश्वर कावरे | उमरा, अकोट तालुका
अकोट तालुक्यातील उमरा गावाच्या सीमेवर असलेल्या ११ केव्ही कासोद फिडरवरील रोहित्राजवळ,
एका मेंढीपाळकावर भीषण प्रसंग ओढावला. दि. १२ एप्...
Continue reading
मुर्तीजापुर | अधर खान
शासनाच्या निद्रिस्त अवस्थेला धक्का देण्यासाठी, आणि शेतकरी व दिव्यांगांच्या हक्कासाठी प्रहार
जनशक्ती पक्षाने ११ एप्रिलच्या रात्री मुर्तीजापुर येथे जोरदार मशा...
Continue reading
अकोला –
एका वयोवृद्ध व्यक्तीची बॅग बळजबरीने हिसकावून पळून गेलेल्या अनोळखी आरोपींच्या मुसक्या आवळण्यात
अकोला पोलिसांना अवघ्या २४ तासांत यश आलं आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडवली ...
Continue reading
नवी दिल्ली –
गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरतेमुळे भारतात सोन्याचे दर विक्रमी उंचीवर पोहोचले आहेत.
सध्या 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 93,390 रुपये, तर 2...
Continue reading
जळगाव –
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना डंपरद्वारे ठार मारण्याची धमकी देणारा खळबळजनक ई-मेल मुख्यमंत्री
कार्यालयाला प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या मेलमध्ये केवळ जिल्हाधिका...
Continue reading
अहमदाबाद –
शहरातील खोखरा परिसरात एका उंच इमारतीच्या चौथ्या मजल्यावर शुक्रवारी सकाळी इलेक्ट्रिक
कुकरमुळे अचानक आग लागली. या आगीत दाट धूर संपूर्ण अपार्टमेंटमध्ये पसरला होता.
या दर...
Continue reading
नवनीत राणा यांच्या विधानावरुन एमआयएमचे प्रवक्ते वारिस पठाण यांनी पलटवार केला आहे. ‘भाजपचे नेते निवडणूक सुरु असताना अशी विधानं करत आहेत. यामुळे नियमांचं, आचारसंहितेचं उघडपणे उल्लंघन होत आहे. निवडणूक आयोगानं या प्रकरणी कठोर कारवाई करायला हवी. या विधानामुळे दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो,’ असं पठाण म्हणाले.
नवनीत राणा यांच्यासारखी विधानं मी केली असती, तर आज मी तुरुंगात असतो, असं पठाण यांनी म्हटलं. ‘१५ मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला करा, असं विधान अकबरुद्दीन ओवैसींनी केलं होतं. त्यानंतर ते स्वत: पोलिसांच्या स्वाधीन झाले. ४० ते ४२ दिवस तुरुंगात राहिले. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला. मग त्यांनी न्यायालयात लढा दिला. मग या प्रकरणातून त्यांची सुटका झाली. आता तसंच विधान राणांनी केलं आहे. निवडणूक आयोग त्यांच्यावर कारवाई कधी करणार? त्यांना तुरुंगात कधी पाठवणार?, असे प्रश्न पठाण यांनी उपस्थित केले आहेत.