गुजरातमधील दाहोद येथे सोमवारी आयोजित जनसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी
‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख करत दहशतवाद्यांना कठोर इशारा दिला.
त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, “जो सिंदूर मिटवेल, त्याचं मिटणं ठरलेलं आहे.”
Related News
IPL 2025 समापन सोहळा: ऑपरेशन सिंदूर आणि भारतीय लष्कराला समर्पित देशभक्तीचा जलवा
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना: मे महिन्याचा हप्ता लवकरच; आदिती तटकरे यांची मोठी घोषणा
सलमान खानचा नवा लुक व्हायरल, ‘भाईजान’च्या मिशांवर फिदा झाले फॅन्स!
PBKS vs RCB IPL Final 2025: पहिल्यांदा विजेतेपदासाठी भिडणार
आयोध्या च्या राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा दुसरा टप्पा
या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी
एकदिवसीय मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
बोर्डी शेतशिवारात प्रि मान्सून कपाशीची लागवड
अकोला जिल्हा ॲडॉक स्केटिंग कमेटी चा सलग ९ तास स्केटिंग उपक्रम यशस्वी
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर संध्याकाळी साडेचार च्या सुमारास भीषण अपघात
पिंजर पोलिसांनी दोन दिवसातच इलेक्ट्रिक तार चोरांना केली मुद्देमालासह अटक
अकोल्यात एका सेवानिवृत्त 60 वर्षीय अभियातांची हत्या…
मोदी म्हणाले की, २२ एप्रिलला दहशतवाद्यांनी एका पित्याला त्याच्या मुलांसमोर गोळ्या घालून ठार केलं.
हे फक्त त्या पित्याचं नव्हे तर १४० कोटी भारतीयांचं आव्हान होतं.
मोदी पुढे म्हणाले, “मोदीशी लढणं किती कठीण आहे, हे दहशतवाद्यांनी स्वप्नातसुद्धा विचारलं नव्हतं.
मी माझ्या तीनही सेनांना मोकळीक दिली आणि त्यांनी ६ मेच्या रात्री २२ मिनिटांत ९
मोठ्या दहशतवादी ठिकाणांचं उच्चाटन केलं.” पाकिस्तानने दुस्साहस
केल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानी पोस्ट्सवरही कठोर कारवाई केली.
अकल्पनीय निर्णय घेणारी सरकार – मोदी
मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं की, “आमच्या सरकारने अभूतपूर्व आणि
अकल्पनीय निर्णय घेतले आहेत.
दशकांपासूनच्या बंधनांना तोडून भारत आज स्वनिर्मितीत आघाडीवर आहे.”
भारतात आता स्मार्टफोन, खेळणी, औषधे, सैन्याची शस्त्रास्त्रे, रेल्वे आणि
मेट्रोसारखी तंत्रज्ञानं तयार होऊन जगभरात निर्यात केली जात आहेत.
वलसाड-दाहोद ट्रेनचा शुभारंभ
गुजरात दौऱ्यात मोदींनी वलसाड-दाहोद ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आणि दाहोद
येथील लोको मॅन्युफॅक्चरिंग युनिट राष्ट्राला समर्पित केलं. यामुळे वलसाड,
वापी आणि आसपासच्या भागात काम करणाऱ्या दाहोदच्या लोकांना प्रवासासाठी मोठी सोय उपलब्ध झाली आहे.
रेल्वे आणि नागरी विकासाचे अनेक प्रकल्प
रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात रेल्वे विभागाच्या
नवीन प्रकल्पांची माहिती देण्यात आली. यामध्ये स्लीपर वंदे भारत ट्रेन आणि
नवीन उत्पादन युनिट्सवर काम सुरु असल्याचंही सांगण्यात आलं.
२२,०५५ घरांचं उद्घाटन व रिवरफ्रंट विकास
पंतप्रधान मोदी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १,००६ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या
२२,०५५ घरांचं उद्घाटन करणार आहेत. यासोबतच ते साबरमती
रिव्हरफ्रंटच्या तिसऱ्या टप्प्याचं भूमिपूजनही करतील, ज्यावर १,००० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/mahinya-dhukyachi-chadar/