आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची
महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. उद्धव ठाकरेंनी दादरच्या
शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी गोंधळ गीताचा
Related News
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
आसाममध्ये उंदरांचा कहर :
इतिहासात १६ एप्रिल : भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास,
तेल्हाऱ्यात शिवसेनेची आढावा बैठक संपन्न –
अलीगडमध्ये देवी-देवतांच्या चित्र असलेल्या नैपकिनवरून वाद; हॉटेल मालक अटकेत
निसर्गाचा अद्भुत चमत्कार
दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचे भजन कीर्तन; CISF जवानांकडून फटकार,
गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात वेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेसवर बलात्कार; पोलीस तपास सुरु
“उर्दू कोणत्याही धर्माची भाषा नाही”; पातूर पालिकेवरील उर्दू फलकाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा! ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’द्वारे प्रवाशांना नवे बँकिंग स्वातंत्र्य
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
अनावरण सोहळा पार पडला. या सोहळ्यावेळी घेतलेल्या पत्रकार
परिषदेत उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याबद्दल भाष्य केले.
“आजपासून नवरात्री सुरू होत आहे. मी आपल्या माध्यमांच्या
माध्यमातून नवरात्रीच्या शुभेच्छा देतो. परंपरे प्रमाणे आपण दसरा
मेळाव्याला शिवाजी पार्कात भेटणार आहोतच. आज नवरात्र सुरू
होत आहे. जगदंबेचा उत्सव आहे. महिषासूर मर्दिनी, असूरांचा वध
करून, जे आसूर माजले होते, त्याचा वध करणाऱ्या मातेचा दिवस
आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
“आजची पत्रकार परिषद राजकीय नाही. राज्यात जे अराजक
माजलं आहे. त्यावर एक गाणं आलं आहे. राज्यात तोतयेगिरी
सुरू आहे. असंच अराजक शिवाजी महाराजांच्यावेळी राज्यावर
आलं होतं. तेव्हा एकनाथांनी बये दार उघड आरोळी मारली होती.
या तोतयेगिरीचा नायनाट करण्यासाठी आपण गाणं तयार केलं
आहे. देवी आणि जनतेच्या चरणी सादर करत आहोत. गाणं
ऑडिओ आहे”, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.
Read also: https://ajinkyabharat.com/katepurna-prakalpatoon-22-49-d-l-g-m-water-immersion-in-one-month/