स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधानंतर निर्णय
शक्तिपीठ महामार्गापाठोपाठ भक्तीपीठ महामार्ग आणि औद्योगिक
महामार्गालाही ब्रेक लागलाय. स्थानिक शेतकऱ्यांनी भूसंपादनाला
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
विरोध केल्याने या तीनही महामार्गांचं भूसंपादन थांबवण्यात आलंय.
नागपूर गोवा असा शक्तिपीठ महामार्ग होणार होता. पुणे नाशिक
औद्योगिक महामार्गा तर सिंदखेड राजा ते शेगाव असा भक्तीपीठ
महामार्ग होणार होता. या तीन महामार्गांची जवळपास सव्वालाख कोटी
रूपयांची गुंतवणूक होती. समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर हे तीन महामार्ग
उभारण्यात येणार होते. शक्तीपीठ, भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्ग
हा महायुती सरकारचा सर्वात महत्वकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जात
होता. आता या तीन्ही महामार्गाच भूसंपादन थांबवण्यात आलं आहे.
राज्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यात या तीन ही महामार्गाची
महत्वाची भूमिका होती. मात्र भूसंपादनाला स्थानिक शेतक-यांनी विरोध केल्यानंतर
एमएसआरडीसीने भूसंपादन थांबवलय. तिन महामार्ग सध्या वादाच्या भोवऱ्यात
अडकल्याने सरकारला बॅकफूटवर जावं लागलं आहे. शक्तीपीठ महामार्गामध्ये
राज्यातील 27 हजार हेक्टर जमिनी अधिग्रहित करण्याची योजना होती. मात्र
शेतकऱ्यांच्या विरोधानंतर राज्य सरकारनं एक पाऊल मागे घेत मोठा निर्णय घेतला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/tension-rises-between-pakistan-and-afghanistan/